Thursday, September 13, 2012

दुष्काळ, सिंचन प्रकल्पांचे जल व्यवस्थापन आणि महसूल विभाग


दुष्काळ, सिंचन प्रकल्पांचे जल व्यवस्थापन आणि महसूल विभाग
आजवर चर्चेत नसलेला तपशील: नकोसा.... हवासा....

     प्रशासनात महसूल विभागाच्या भूमिकेचे महत्व अनन्यसाधारण आहे हे काही मुद्दाम सांगण्याची गरज नाही. निवडणुका, कायदा व सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती वगैरे संदर्भात असंख्य जबाबदा-या महसूल विभाग नेहेमीच बजावत असतो. सध्याच्या दुष्काळात तर या विभागाची भूमिका कळीची राहणार आहे. ही जादाची व जोखमीची जबाबदारी महसूल विभाग व्यवस्थित पार पाडेल यात शंका नाही. दुष्काळी परिस्थितीत (व अन्यथाही!) सिंचन प्रकल्पांच्या जल व्यवस्थापना बाबत महसूल विभागाने सिंचन कायद्यांप्रमाणेही आपली जबाबदारी पार पाडणे अपेक्षित आहे. त्या फारशा माहित नसलेल्या व म्हणून चर्चेत नसलेल्या बाबींचा तपशील या लेखात दिला आहे. तो तपशील अभ्यासून या दुष्काळाच्या निमित्ताने महसूल विभागाने कार्यवाही व प्रसंगी कारवाई सुरू केल्यास चांगले गुणात्मक बदल संभवतात. महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत त्वरित लक्ष घालणे आवश्यक आहे.

     सिंचन प्रकल्पांचे जल व्यवस्थापन आणि महसूल विभाग यांचा काय संबंध असू शकतो? असा प्रश्न अनेकांना कदाचित पडू शकेल. पण तसा संबंध सिंचन कायद्याने अभिप्रेत आहे. काही तरतुदींमूळे तो प्रत्यक्ष स्वरुपात आहे तर काही अन्य तरतुदींमूळे अप्रत्यक्षरित्या. प्रशासनात महसूल विभाग सर्व शासकीय विभागांचा कधी समन्वयक म्हणून तर कधी प्रमुख म्हणून भूमिका बजावतो. अशी भूमिका बजावताना संबंधित अन्य विभागांचे कायदेकानू काय आहेत हे माहित असल्यास काम सूकर होते. प्रत्येक विभागाच्या कायदेशीर जबाबदा-या व कर्तव्ये स्पष्ट होतात. नको ती कामे स्वत:वर ओढवून घेणे किंवा जी कामे करायला हवीत ती माहिती अभावी न करणे हा प्रकार टाळता येतो. जल संपदा विभागाला "नकोसा" वाटणारा तो तपशील महसूल विभागाला कदाचित "हवासा" वाटेल.

    महाराष्ट्रात सध्या अंमलात असलेल्या सिंचन कायद्यांबद्दलचे सविस्तर विवेचन साप्ताहिक "आधुनिक किसान"ने प्रसिद्ध केलेल्या लाभक्षेत्रे-कुरूक्षेत्रे या सदराच्या विधिलिखित या पहिल्या भागात आले आहे. जिज्ञासूंनी त्या करिता उपरोक्त साप्ताहिकाचे पहिले १४ अंक (९ फेब्रुवारी ते १० मे २०१२) आवर्जून पहावेत.

    महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ मधील महसूल विभागाशी संबंधीत कलमे तक्ता क्र १ मध्ये दिली आहेत. त्या स्वयंस्पष्ट तपशीलाप्रमाणे महसूल विभाग आपली कायदेशीर जबाबदारी पार पाडत आहे का? याचा सखोल व समग्र आढावा महसूल विभागानेच आता घेतला पाहिजे असे वाटते.
          सिंचन हंगामा पूर्वी पाण्याचे अंदाजपत्रक (पी.आय.पी) व पाणी वाटपाचे वेळापत्रक न बनवणे अथवा योग्य रित्या न बनवणे, अनमान धपक्याने अंमलबजावणी करणे, कालव्याच्या देखभाल-दुरूस्तीकडे दूर्लक्ष करणे आणि पाणीचोरी वर निर्बंध न घालणे यामूळे पाणी वाटपात संघर्ष व त्यातून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. ते होऊ नयेत म्हणून किमान दुष्काळी परिस्थितीत तरी जल व्यवस्थापन व्यवस्थित करण्यासाठी महसूल विभागाने जल संपदा विभागाकडे आग्रह धरावा. संयुक्त बैठका घेऊन खातरजमा करावी. पी.आय.पी. बद्दलचे सविस्तर विवेचन साप्ताहिक "आधुनिक किसान"ने प्रसिद्ध केलेल्या लाभक्षेत्रे-कुरूक्षेत्रे या सदराच्या जल वास्तव या दुस-या  भागात आले आहे. जिज्ञासूंनी त्या करिता उपरोक्त साप्ताहिकाचे  अंक क्र.२५ ते ३० (२६ जूलै ते ३० ऑगस्ट २०१२) आवर्जून पहावेत.

दुष्काळी परिस्थितीतसुद्धा ज्या सिंचन प्रकल्पांच्या जलाशयात थोडाफार जल साठा उपलब्ध आहे आणि शेती करिता पाणी दिले जाऊ शकते तेथे खालील विशिष्ठ बाबींचा ताबडतोबीने आग्रह धरला जावा असे वाटते.

) धरणात साठणा-या पाण्याच्या वापराचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शक सूत्रे, शासन निर्णय क्र. संकीर्ण १०.००/ (१९/२०००)/सिं.व्य.(धो) दि...२००१
) पाटबंधारे विभाग शासन पत्र क्र.सीडीए १००४/(३६५/२००४)लाक्षेवि(कामे) दि.२६.१०.२००४
) कमी पाणी लागणारी पिके घेणे बंधनकारक करण्याकरिता महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम,१९७६ मधील कलम क्र.४७,४८ व ४९ ची अंमलबजावणी

चांगले शासन निर्णय व कायद्यातील उचित तरतुदी दुष्काळी परिस्थितीत तरी किमान अंमलात आणा हे सांगण्याची पाळी यावी हा काय प्रकार आहे? आपण कोठे चाललो आहोत?

तक्ता क्र १: महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम,१९७६ मधील महसूल विभागाशी संबंधीत कलमे
कलम
तरतुद
हेतू
परस्पर संबंध
कालव्याच्या जलप्रदाय क्षेत्राखालील जमीनी
सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्राचे अधिसूचितीकरण करणे
मूळ जबाबदारी जल संपदा विभागाची पण
-कृषिकरण (एन..) संदर्भात महसूल विभागाचा संबंध येतो
५ ते १०
पाटबंधारे क्षेत्रे; कालवा अधिकारी, त्याचा कार्यभार व अधिकार
सिंचन व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करणे
"दुस-या वर्गाची पाटबंधारे विषयक बांधकामे": महसूल
विभागाची जबाबदारी  (कलमे ११७ ते १३०)
"पहिल्या वर्गाची पाटबंधारे विषयक बांधकामे": जल संपदा विभागाची जबाबदारी (कलमे १ ते ११६)
११
कालवे बांधणे व ते सुस्थितीत ठेवणे -- कालव्याच्या प्रयोजनासाठी पाण्याचे उपयोजन
सिंचन प्रकल्पांशी संबंधित नदीनाल्यांचे अधिसूचितीकरण करणे
जल संपदा विभागाने अधिसूचना काढल्यास नदीनाल्यातील पाण्यावर कायदेशीर अधिकार व म्हणून जल व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी त्या विभागाची;
जल संपदा विभागाने अधिसूचना न काढल्यास नदीनाल्यातील पाण्यावर कायदेशीर अधिकार व म्हणून जल व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी महसूल विभागाची.
पाणी पुरवठयात खंड पडल्याबद्दल भरपाईची सुनावणी कलम क्र.७८ अन्वये जिल्हाधिका-यांनी करणे अपेक्षित आहे पण त्याकरिता कलम ८० अन्वये जिल्हाधिका-यांनी नोटीस काढायला हवी 
८८ ()
पाणीपट्टीच्या रकमा देणे व त्याची वसुली
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम १७६ अन्वये सक्तीच्या मार्गाने  पाणीपट्टीची थकबाकी वसूल करणे
याबाबत मूळ जबाबदारी महसूल विभागाची आहे असे पूर्वी मानण्यात येत होते पण एका शासन निर्णयानुसार (संकीर्ण १०./(८७/२००१)/सिं.व्य.(धो) दि.३१ मार्च २००३, परिच्छेद क्र.१७) जल संपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबत जिल्हाधिका-यांच्या समकक्ष अधिकार देण्यात आले आहेत. ते वापरले जातात किंवा कसे हे स्पष्ट नाही. उपरोक्त परिच्छेदात जिल्हा परिषदेकरिता लावण्यात आलेल्या पाणीपट्टी वरील स्थानिक उपकरासंबंधी जमीन महसूल वसूली प्रमाणपत्र जिल्हाधिका-यांकडे पाठवावे असेही म्हटले आहे.
९७ +
५१
ज्याच्या सहाय्याने कालव्यांचे पाणी अनधिकृतरित्या वापरण्यात येते अशा यंत्राच्या व उपकरण संचाच्या बाबतीतील कार्यपद्धती
पाणी चोरी रोखणे
मूळ जबाबदारी जल संपदा विभागाची आहे. पण प्रत्यक्ष कारवाई मात्र महसूल विभागाच्या  पुढाकाराने व त्याच्या नेतृत्वाखाली होताना दिसते. योग्य ती जबाबदारी व कार्यकक्षा निश्चित करणे योग्य होईल.
 [Published in Weekly "Aadhunik Kisan", Aurangabad,13 to 19 Sept.2012]

Friday, September 7, 2012

"जायकवाडी" साठी पाण्याची मागणी


प्रदीप पुरंदरे BE (Civil) ME (WUM)
 स्वेच्छा-सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद.
                                  जलक्षेत्रातील मुक्त अभ्यासक, प्रशिक्षक व समुपदेशक
(सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन, पाणी वापर संस्था व सिंचन कायदे)
दूरध्वनी:०२४०-२३४११४२, मो. ९८२२५६५२३२, ८९८३५२८६४० ई-मेल: pradeeppurandare@gmail.com
बी-१२, प्राईड टॉवर्स, वेदांतनगर, तिवारी मंगल कार्यालयाजवळ, एम.आय.डी.सी. रेल्वे स्टेशन, औरंगाबाद ४३१००५
दिनांक ७ सप्टेंबर २०१२
(ई-मेल द्वारे)
प्रति,
मा. मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य पदसिद्ध अध्यक्ष, राज्य जल परिषद
विषय: "जायकवाडी" साठी पाण्याची मागणी
महोदय,
      दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या मराठवाडयातील सर्वसामान्य शेतकरी, ग्रामीण व शहरी नागरिक, उद्योजक, लोकप्रतिनिधी, वृत्तपत्रे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि एवढेच नव्हे तर खुद्द महसूल आयुक्त अशा सर्वांनी जायकवाडीसाठी वरच्या धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली आहे ह्याची आपणास कल्पना आहेच. दि.८ सप्टेंबर २०१२ रोजी आपण मराठवाडयात आहात असे वृत्तपत्रातील बातम्यांवरून कळाले. तहानलेल्या मराठवाडयातील जन भावना लक्षात घेऊन आपण दि.८ सप्टेंबर २०१२ रोजी जायकवाडीसाठी वरच्या धरणांतून पाणी सोडण्याचे सूस्पष्ट आदेश द्यावेत अशी आग्रहाची विनंती मी आपणास या पत्राद्वारे करत आहे.
      या निमित्ताने मी आपले लक्ष जल क्षेत्रातील अन्य काही गंभीर बाबींकडेही वेधु इच्छितो. महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाने १९९९ साली खोरे/उपखोरेनिहाय जल संपदा विकास व व्यवस्थापन करण्याची शिफारस केली होती. त्या महत्वपूर्ण शिफारशीकडेच केवळ दूर्लक्ष झाले असे नव्हे तर त्या आयोगाचा एकूण अहवालच धूळ खात पडला आहे. राज्याने २००३ साली स्वीकारलेल्या जलनीतीत दर पाच वर्षांनी सुधारणा करणे अभिप्रेत आहे. तशा सुधारणा अद्याप झालेल्या नाहीत. पाणी वापराचा तथाकथित बदललेला प्राधान्यक्रम प्रत्यक्षात अंमलात आलेला नाही. विधान मंडळाने विधिवत अस्तिवात आणलेले महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण सर्वसामान्यांकरिता कूचकामी ठरले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम,२००५ अन्वये आपण स्वत: २००५ सालीच अस्तित्वात आलेल्या राज्य जल परिषदेचे मुख्यमंत्री म्हणून पदसिद्ध अध्यक्ष आहात. तर राज्याचे मुख्य सचिव राज्य जल मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या परिषद व मंडळाची गेल्या सात वर्षात एकही बैठक झालेली नाही. उपरोक्त कायदा अंमलात आल्यापासून सहा महिन्यात एकात्मिकृत राज्य जल आराखडा तयार व्हायचा होता. सात वर्षे झाली तरी तो आराखडा अद्याप तयार नाही. जल परिषदेने म्हणजे लोकप्रतिनिधींनी त्या आराखडयास मंजूरी दिल्यावर मग त्या आराखडयानुसार  महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने विविध प्रकल्पांना मान्यता देणे कायद्याने अभिप्रेत आहे. पण तो आराखडा नसताना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण धडाधड प्रकल्प मंजूर करते आहे. लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर हे खुलेआम अतिक्रमण नव्हे काय? उपरोक्त कायद्यानुसार पाटबंधारे महामंडळांनी खरेतर नदीखोरे अभिकरणे म्हणून काम केले पाहिजे व पाणी वापर हक्कांची अंमलबजावणी केली पाहिजे. पाटबंधारे महामंडळे त्यांची कायदेशीर जबाबदारी पार पाडत नाहीत हा ज्या विधान मंडळाने कायदा केला त्या विधान मंडळाचा व पर्यायाने तमाम जनतेचा अवमान नव्हे काय? जल क्षेत्रा बाबत अशा अनेक गंभीर बाबी सांगता येतील. पण विस्तारभयास्तव ते टाळतो. मुद्दा हा आहे की, जर सिंचन आयोगाच्या अहवालावर कार्यवाही झाली असती, जलनीतीत काळानुरूप बदल झाले असते, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने फक्त निवडक तरतूदींवर लक्ष केंद्रित न करता (उदाहरणार्थ, पाण्याचे व्यापारीकरण!) आपल्या सर्व जबाबदा-या वेळीच पार पाडल्या असत्या, नदी खोरे अभिकरणांनी आपले कायदेशीर कर्तव्य पार पाडले असते तर जल संकटाला/दुष्काळाला आपण जास्त चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकलो असतो. एकविसाव्या शतकाला साजेसे आधुनिक व समन्यायी जल व्यवस्थापन शक्य झाले असते. आणि मग जायकवाडीसाठी पाणी सोडा अशी मागणीच आली नसती कारण नियमांनुसार विहित कार्यपद्धतीने ते कदाचित झालेही असते. (जल क्षेत्रातील बहुसंख्य कायद्यांना आज नियमच नाहीत आणि म्हणून काहीच विहित नाही ही खेदाची गोष्ट आहे)
     या पार्श्वभूमिवर मी आपणांस विनंती करतो की जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतानाच आपण राज्य जल परिषदेची त्वरित बैठक बोलवावी आणि त्या बैठकीत जल संपदा विभागाला एकदा सुक्ष्मदर्शक यंत्राखाली घ्यावे. श्वेतपत्रिका आवश्यक आहेच पण पुरेशी नाही.
      माझ्या ब्लॉगवर [jaagalyaa-thewhistleblower.blogspot.in]  सिंचन व्यवस्थापना संबंधी खूप तपशील उपलब्ध आहे. शासनाने त्याची दखल घ्यावी ही नम्र विनंती.
धन्यवाद.
आदराने,
आपला विश्वासू,

(प्रदीप पुरंदरे)



महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थापनाची दूर्दशा


प्रदीप पुरंदरे
BE (Civil) ME (WUM) स्वेच्छा-सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद.
                                    जलक्षेत्रातील मुक्त अभ्यासक, प्रशिक्षक व समुपदेशक
(सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन, पाणी वापर संस्था व सिंचन कायदे)
दूरध्वनी:०२४०-२३४११४२, मो. ९८२२५६५२३२, ८९८३५२८६४० ई-मेल: pradeeppurandare@gmail.com
बी-१२, प्राईड टॉवर्स, वेदांतनगर, तिवारी मंगल कार्यालयाजवळ, एम.आय.डी.सी. रेल्वे स्टेशन, औरंगाबाद ४३१००५
दिनांक ७ ऑगस्ट २०१२
प्रति,
) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य पदसिद्ध अध्यक्ष, राज्य जल परिषद
) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य पदसिद्ध अध्यक्ष, राज्य जल मंडळ
    विषय: महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थापनाची दूर्दशा /
          राज्य जल मंडळ व राज्य जल परिषदेची बैठक बोलावण्याबाबत
    संदर्भ: ) "सिंचन प्रकल्पांची दैना", दै.दिव्य मराठी, औरंगाबाद, दि...२०१२
         ) "फसवा जल लेखा", दै. लोकसत्ता, मुंबई, दि.२२..२०१२
         ) "काटेकोर व्यवस्थापनाची गरज", दै. महाराष्ट्र टाईम्स, औरंगाबाद, दि...२०१२
         ) "केवळ बंदोबस्त अन जुगाड", दै. महाराष्ट्र टाईम्स, औरंगाबाद, दि...२०१२
                  ) "पी.आय.पी." संदर्भातील जल संपदा मंत्र्यांना लिहिलेले पत्र, दि...२०१२
         ) "पाण्याचे गौडबंगाल उघड करणारे गेज रजिस्टर गायब? मांजरातील पाणीवाटप चौकशीचे प्रकरण",     
            दै. सकाळ, औरंगाबाद, दि...२०१२
                 (सुलभ संदर्भाकरिता क्र.१ ते ६ च्या प्रती सोबत जोडल्या आहेत)
         ) "लाभक्षेत्रे-कुरूक्षेत्रे" या सदरातील माझी लेखमालासाप्ताहिक आधुनिक किसान
             औरंगाबाद, ९ फेब्रुवारी २०१२ पासून
         jaagalyaa-thewhistleblower.blogspot.in  या माझ्या ब्लॉग वरील लिखाण
 महोदय,
       प्रारंभिक सिंचन कार्यक्रम म्हणजे पी.आय.पी. संदर्भातील जल संपदा विभागाची मार्गदर्शक तत्वे, अद्ययावत टॅंक चार्ट, अद्ययावत कपॅसिटी टेबल, त्या त्या प्रकल्पात प्रत्यक्ष मोजलेले बाष्पीभवन-व्यय, जलाशय व वितरण व्यवस्थेच्या त्या त्या प्रकल्पात प्रत्यक्ष मोजलेल्या कार्यक्षमता, अधिकृत करारनाम्यांवर आधारित बिगर सिंचनाची मागणी, अधिकृतरित्या मंजूर केलेला पीआयपी, स्थळ, काळ व परिस्थितीला न्याय देणारे पाणी-पाळीचे कार्यक्रम, प्रामाणिक जल लेखा आणि सिंचन कायदा या सर्वांआधारे आधारे राज्यातील बहूसंख्य सिंचन प्रकल्पात सिंचन व्यवस्थापन कसे होत नाही यावर संदर्भीय लेख, पत्र, बातमी, लेखमाला व ब्लॉग पुरेसा प्रकाश टाकतात असे वाटते. महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थापनाची आज दूर्दशा झाली आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. राज्य दुष्काळाच्या सावटाखाली असताना सिंचन व्यवस्थापनाची ही दशा मन विषण्ण करणारी आहे.
      २००५ साली विधिवत अस्तित्वात आलेल्या राज्य जल मंडळ व राज्य जल परिषदेची बैठक बोलावून पाणी प्रश्नावर एका व्यापक व सखोल विचार विनिमयाची प्रक्रिया वरील पार्श्वभूमिवर नव्याने सुरू करावी ही नम्र विनंती.

धन्यवाद.
आदराने,
आपला विश्वासू,

(प्रदीप पुरंदरे)
सोबत: वरील प्रमाणे
प्रत माहितीकरिता सविनय सादर
 मा. अध्यक्ष, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई
    


  






Wednesday, September 5, 2012

दुष्काळ - एक इष्टापत्ती!


दुष्काळ - एक इष्टापत्ती!

    महाराष्ट्रात या वर्षी दुष्काळ पडणार हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. या संकटाला एक इष्टापत्ती मानून त्यास सामोरे जाणे आणि दुष्काळ निवारणा बरोबरच दुष्काळ निर्मूलनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हाच एक मार्ग आता आपणा समोर आहे. एकीकडे जल-साठे वाढवणे आणि दूसरीकडे असलेले जल-साठे कार्यक्षम व समन्यायी पद्धतीने वापरणे हेच खरे, मूलभूत व दूरगामी उपाय आहेत. त्या दृष्टिने या लेखात सूत्ररूपाने काही मांडणी केली आहे.

) जून २०१३ पर्यंत हमखास पूर्ण होतील व येत्या पावसाळ्यात त्यात पाणी-साठा करता येईल असे बांधकामाधीन प्रकल्प (प्रामुख्याने लघु व मध्यम) युद्ध पातळीवर कालवा व वितरण व्यवस्थेसह पूर्ण करावेत. केवळ पॅकेजेस वर विसंबून न राहता त्या करिता लागणारा पैसा उभा करण्याकरिता खालील पर्यायांचा गांभीर्याने विचार व्हावा.
() शासनाने जल-रोखे काढावेत.
() विविध धर्म, जाती, पंथ यांच्या देवस्थानात व ट्रस्ट मध्ये प्रचंड प्रमाणावर सोनेनाणे व जडजवाहिर आज पडून आहे. त्या मृत गुंतवणुकीचा उत्पादक कामांसाठी उपयोग व्हावा या हेतूने शासनाने एक व्यवहार्य योजना तयार करावी. कोणाच्याही श्रद्धांचा अवमान आणि त्यांचे आर्थिक नुकसान न करता सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहभागाने त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात/तालुक्यात ही योजना विधिवत अंमलात आणावी.
() जल संकटाला एका अर्थाने वाळूचा अमर्याद  उपसा करणारे वाळू-माफिया जबाबदार असल्यामूळे त्यांच्या अवैध मालमत्ता शासनाने ताब्यात घ्याव्यात व त्यांचा लिलाव करून येणारा पैसा अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याकरिता वापरावा.
() विविध सहकारी संस्था, कारखाने, व्यापारी प्रतिष्ठाने वगैरेंनी काही प्रकल्प (पूर्णत: वा अंशत:) दत्तक घ्यावेत आणि आधुनिक व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाआधारे ते स्वखर्चाने पूर्ण करावेत.
() विविध बॅंकामधील  दावा न करण्यात आलेला (अन-क्लेम्ड) पैसा प्रस्तुत कामाकरिता वापरता येईल का हे तपासून पहावे.
() मध्यम वर्गावर समाजाचे प्रबोधन करण्याची नैतिक जबाबदारी असते. चंगळवादात अडकलेला मध्यम वर्ग आता ती जबाबदारी पार पाडेनासा झाला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर मध्यम वर्गाने अंतर्मूख व्हावे. पाणी या विषयाकडे त्याने केलेल्या दूर्लक्षा बाबत आपणहून प्रायश्चित्त घ्यावे. प्रत्येक मध्यम वर्गीय कुटूंबाने किमान अर्धा ग्रॅम सोने प्रस्तुत कामाकरिता शासनाकडॆ देणगी म्हणुन द्यावे. शासनाने त्याकरिता विशिष्ट ऎच्छिक स्वरूपाची योजना तयार करावी.

) पूर्ण झालेल्या पण यावर्षी पाण्याअभावी कोरडया पडलेल्या प्रकल्पातील गाळ (विशेषत: उपयुक्त जल-साठयातील) काढावा. टेल पर्यंत पाणी जाण्यास अडथळा ठरणा-या कालव्यावरील नादुरूस्त कामांची दुरूस्ती करावी. लोकसहभाग व प्रायोजकत्वाच्या तत्वाने हे काम करावे. शासनाने त्याकरिता खर्च करू नये. देवधर्म, लग्न-मुंजी, सणवार, साहित्य संमेलने या सारख्या कार्यक्रमांवर खर्च होणारा पैसा या वर्षी अशा कामांकडे वळवला जावा. खासदार व आमदारांच्या निधीतूनही कामे करता येतील. नागरी भागातील विहिरींबाबत तसेच वर्षा-जल संचयासाठीही (रेन वॉटर हार्वेस्टिंग) हे धोरण अंमलात आणता येईल.

) पाण्याच्या चंगळवादी वापरावर कठोर निर्बंध आणावेत. मद्य, बियर, शितपेये, जल क्रिडा (वॉटर स्पोर्टस) वगैरे करिता पाणी देऊ नये

) टॅंकरने पाणी पुरवठा करणे व बाटलीबंद पाणी ( बॉटल्ड वॉटर) या दोन्ही प्रकारांबाबत तुटीचे वाटप व पाण्याचे रेशनिंग या करिता नवीन नियमावली/कार्यपद्धती तयार करण्यात यावी.

) जलक्षेत्रात आज कायद्याचे राज्य नाही. ते आणण्यासाठी खालील गोष्टी पूर्ण करण्याकरिता धडक मोहिम हाती घ्यावी
() महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम,१९७६(.पा..७६) चे नियम तयार करणे; नदी-नाले, लाभक्षेत्र, उपसा सिंचन, इत्यादिच्या अधिसूचना काढणे; पाणी चोरी व पाणीनाशाबद्दल गुन्हे दाखल करणे व त्याबाबत कालवा अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करणे; विभागीय मुख्य अभियंत्यांनी "मुख्य नियंत्रक प्राधिकारी" या नात्याने आपली कायदेशीर भूमिका म.पा..७६ मधील कलम क्र.७ अन्वये पार पाडणे
() महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्रधिकरण(..नि.प्रा.) अधिनियम,२००५ या कायद्यातील खालील मूलभूत तरतुदींची ताबडतोब अंमलबजावणी करणे
) नदीखोरे अभिकरणे, राज्य जल मंडळ, व राज्य जल परिषद कार्यान्वित करणे आणि एकात्मिकृत राज्य जल आराखडा तयार करणे
) नदीखो-यातील पाण्याची तूट समप्रमाणात विभागणे व खालच्या धरणांसाठी वरच्या धरणातून (किमान पिण्यासाठी तरी) पाणी सोडणे
) बारमाही पिकांना ठिबक किंवा तुषार सिंचन बंधनकारक करणे
) तुटीच्या वर्षात लाभक्षेत्रातील जमीनधारकांना किमान एक एकर जमिनीसाठी पाणी देणे
.) सिंचन-अनुशेषग्रस्त जिल्हे व विभागाच्या बाबतीत विशेष जबाबदारी पार पाडणे
) सर्वसमावेशक जलहवामानशास्त्रीय माहिती यंत्रणा उभारणे
) पाण्याचे सूयोग्य संधारण व व्यवस्थापन करण्याच्या पद्धतींचे प्रचालन व अंमलबजावणी करणे
    ) पाणी वापरासंबंधीची आधारसामग्री निर्माण करणे
    ) पिण्याचे व घरगुती वापराचे पाणी आणि औद्योगिक पाणी पुरवठा यांचे नियमन करणे व त्याकरिता विनियामक व प्राथमिक विवाद निवारण अधिकारी नेमणे; विविध उद्योगांकरिता करण्यात आलेले जल-आरक्षण त्या त्या उद्योगांना लागणा-या प्रक्रिया-जलाच्या (प्रोसेस-वॉटर) प्रमाणात आहे की नाही हे तपासून पहाणे व जास्तीचे पाणी येत्या रब्बी हंगामात उद्योगांकडून शेतीकडे वळवणे.
    पाण्याचा व्यापारा संदर्भातील अनावश्यक व अनाठायी कार्यवाही थांबवून  
    ..नि.प्रा.ने या दुष्काळी वर्षापासून तरी निदान वर नमूद केलेल्या कामात "अर्ध-
    न्यायिक स्वायत्त नियमन प्राधिकरण" या त्यांच्याकडून मूळात अभिप्रेत असलेल्या
    भूमिकेस न्याय देत लक्ष घालावे. अन्यथा, राज्यपालांनी म..नि.प्रा.स त्याबाबत
    आदेश द्यावेत.
() महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतक-यांकडून व्यवस्थापन (मसिंपशेव्य) अधिनियम, २००५ या कायद्यानुसार उपसा सिंचन योजनांकरिता पाणी वापर संस्था स्थापन करणे
() मसिंपशेव्य कायद्यानुसार स्थापन झालेल्या प्रवाही सिंचन पाणी वापर संस्थांच्या अडचणी वाल्मी तसेच इतर व्यासपीठांवरून अनेक वर्षे मांडल्या जात आहेत. त्याबाबत शासनस्तरावर तात्काळ निर्णय घेणे

) ज्या सिंचन प्रकल्पात जलसाठा उपलब्ध आहे त्या प्रकल्पात प्राथमिक सिंचन कार्यक्रम व पाणी-पाळ्यांचे नियोजन आणि एकूणच सिंचन व्यवस्थापन लोकाभिमुख पद्धतीने व्हावे. जेथे शक्य असेल तेथे किमान एक दोन पाणी-पाळ्या तरी शेती करिता द्याव्यात. त्याचे नियोजन कमी पाणी लागणारी पिके व त्या पिकांची अवस्था (क्रिटिकल ग्रोथ स्टेज) लक्षात घेऊन वाल्मीच्या सहाय्याने करावे. वाल्मीने या वर्षी "दुष्काळातील जल नियोजन" या एका विषयावरच फक्त लाभक्षेत्रात जाऊन प्रशिक्षण वर्ग घ्यावेत. कृषि विद्यापीठे व विज्ञान केंद्रांनीही त्यात सहभागी व्हावे.

) जलाशयातील गाळ, बाष्पीभवन, गळती; कालव्यातील प्रवाह व वहनव्यय; आणि भिजलेले क्षेत्र सर्व प्रकल्पात प्रत्यक्ष मोजण्याची व्यवस्था या वर्षापासून तरी व्हावी

) वाल्मीने प्रस्तावित केलेले आणि म..नि.प्रा.ने जलदर निश्चिती करताना वापरलेले कालवा देखभाल-दुरूस्ती निधी संदर्भातील सुधारित निकष शासनाने अधिकृतरित्या स्वीकारावेत व त्यानुसार कालवा देखभाल-दुरूस्ती निधी या वर्षापासून प्रत्यक्ष द्यावा.

) कालवा देखभाल-दुरूस्तीकरिता जल संपदा विभागाने येत्या सहा महिन्यात मॅन्युअल तयार करावे. अंतरिम व्यवस्था म्हणून १ ऑक्टोबर पूर्वी कालवा देखभाल-दुरूस्तीची मार्गदर्शक तत्वे विशद करणारा तांत्रिक शासन निर्णय (टेक्निकल जी.आर.) काढावा.

१०) पाणी वापर संस्था, उपसा सिंचन व बिगर सिंचना करिता करारनामे करण्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी.

११) महाराष्ट्र जलसंपत्ती विकास केंद्रातर्फे (..वि.कें.) आजवर झालेल्या तपासणीचा/पाहणीचा तपशील पूर्तता अहवालांसह (ॅक्शन टेकन रिपोर्ट) जाहीर करावा. ..वि.कें. ने या वर्षी उपरोक्त तपासणी/पाहणी वर विशेष भर द्यावा. पाणी व क्षेत्र न मोजता करण्यात येत असलेल्या जललेखा वा बेंचमार्किंग वर वेळ वाया न घालवता या वर्षी फक्त उपरोक्त पाहणी अहवालच तयार करावा व तो १ जून २०१३ पूर्वी जाहीर करावा.

) मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षते खाली राज्य जल परिषद आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य जल मंडळ २००५ सालीच अस्तित्वात आले आहे. त्यांची एकही बैठक अद्याप झालेली नाही. दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर दोहोंच्या बैठका आयोजित कराव्यात आणि त्यात राज्यातील दुष्काळावर तपशीलवार चर्चा व्हावी.

१३) वरील गोष्टी खरेच अंमलात आणायच्या असतील तर जल संपदा विभागाच्या दोन्ही सचिवपदी तसेच सचिव दर्जाच्या अन्य ७ पदांवर त्वरित आय..एस.अधिका-यांची नेमणूक करावी. मुख्य नियंत्रक प्राधिकारी म्हणून कायदेशीर जबाबदारी पार न पाडणा-या मुख्य अभियंत्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी
 [Published in Weekly "Aadhunik Kisan", Aurangabad, 6 -12 Sept. 2012]