Friday, September 7, 2012

"जायकवाडी" साठी पाण्याची मागणी


प्रदीप पुरंदरे BE (Civil) ME (WUM)
 स्वेच्छा-सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद.
                                  जलक्षेत्रातील मुक्त अभ्यासक, प्रशिक्षक व समुपदेशक
(सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन, पाणी वापर संस्था व सिंचन कायदे)
दूरध्वनी:०२४०-२३४११४२, मो. ९८२२५६५२३२, ८९८३५२८६४० ई-मेल: pradeeppurandare@gmail.com
बी-१२, प्राईड टॉवर्स, वेदांतनगर, तिवारी मंगल कार्यालयाजवळ, एम.आय.डी.सी. रेल्वे स्टेशन, औरंगाबाद ४३१००५
दिनांक ७ सप्टेंबर २०१२
(ई-मेल द्वारे)
प्रति,
मा. मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य पदसिद्ध अध्यक्ष, राज्य जल परिषद
विषय: "जायकवाडी" साठी पाण्याची मागणी
महोदय,
      दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या मराठवाडयातील सर्वसामान्य शेतकरी, ग्रामीण व शहरी नागरिक, उद्योजक, लोकप्रतिनिधी, वृत्तपत्रे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि एवढेच नव्हे तर खुद्द महसूल आयुक्त अशा सर्वांनी जायकवाडीसाठी वरच्या धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली आहे ह्याची आपणास कल्पना आहेच. दि.८ सप्टेंबर २०१२ रोजी आपण मराठवाडयात आहात असे वृत्तपत्रातील बातम्यांवरून कळाले. तहानलेल्या मराठवाडयातील जन भावना लक्षात घेऊन आपण दि.८ सप्टेंबर २०१२ रोजी जायकवाडीसाठी वरच्या धरणांतून पाणी सोडण्याचे सूस्पष्ट आदेश द्यावेत अशी आग्रहाची विनंती मी आपणास या पत्राद्वारे करत आहे.
      या निमित्ताने मी आपले लक्ष जल क्षेत्रातील अन्य काही गंभीर बाबींकडेही वेधु इच्छितो. महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाने १९९९ साली खोरे/उपखोरेनिहाय जल संपदा विकास व व्यवस्थापन करण्याची शिफारस केली होती. त्या महत्वपूर्ण शिफारशीकडेच केवळ दूर्लक्ष झाले असे नव्हे तर त्या आयोगाचा एकूण अहवालच धूळ खात पडला आहे. राज्याने २००३ साली स्वीकारलेल्या जलनीतीत दर पाच वर्षांनी सुधारणा करणे अभिप्रेत आहे. तशा सुधारणा अद्याप झालेल्या नाहीत. पाणी वापराचा तथाकथित बदललेला प्राधान्यक्रम प्रत्यक्षात अंमलात आलेला नाही. विधान मंडळाने विधिवत अस्तिवात आणलेले महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण सर्वसामान्यांकरिता कूचकामी ठरले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम,२००५ अन्वये आपण स्वत: २००५ सालीच अस्तित्वात आलेल्या राज्य जल परिषदेचे मुख्यमंत्री म्हणून पदसिद्ध अध्यक्ष आहात. तर राज्याचे मुख्य सचिव राज्य जल मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या परिषद व मंडळाची गेल्या सात वर्षात एकही बैठक झालेली नाही. उपरोक्त कायदा अंमलात आल्यापासून सहा महिन्यात एकात्मिकृत राज्य जल आराखडा तयार व्हायचा होता. सात वर्षे झाली तरी तो आराखडा अद्याप तयार नाही. जल परिषदेने म्हणजे लोकप्रतिनिधींनी त्या आराखडयास मंजूरी दिल्यावर मग त्या आराखडयानुसार  महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने विविध प्रकल्पांना मान्यता देणे कायद्याने अभिप्रेत आहे. पण तो आराखडा नसताना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण धडाधड प्रकल्प मंजूर करते आहे. लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर हे खुलेआम अतिक्रमण नव्हे काय? उपरोक्त कायद्यानुसार पाटबंधारे महामंडळांनी खरेतर नदीखोरे अभिकरणे म्हणून काम केले पाहिजे व पाणी वापर हक्कांची अंमलबजावणी केली पाहिजे. पाटबंधारे महामंडळे त्यांची कायदेशीर जबाबदारी पार पाडत नाहीत हा ज्या विधान मंडळाने कायदा केला त्या विधान मंडळाचा व पर्यायाने तमाम जनतेचा अवमान नव्हे काय? जल क्षेत्रा बाबत अशा अनेक गंभीर बाबी सांगता येतील. पण विस्तारभयास्तव ते टाळतो. मुद्दा हा आहे की, जर सिंचन आयोगाच्या अहवालावर कार्यवाही झाली असती, जलनीतीत काळानुरूप बदल झाले असते, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने फक्त निवडक तरतूदींवर लक्ष केंद्रित न करता (उदाहरणार्थ, पाण्याचे व्यापारीकरण!) आपल्या सर्व जबाबदा-या वेळीच पार पाडल्या असत्या, नदी खोरे अभिकरणांनी आपले कायदेशीर कर्तव्य पार पाडले असते तर जल संकटाला/दुष्काळाला आपण जास्त चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकलो असतो. एकविसाव्या शतकाला साजेसे आधुनिक व समन्यायी जल व्यवस्थापन शक्य झाले असते. आणि मग जायकवाडीसाठी पाणी सोडा अशी मागणीच आली नसती कारण नियमांनुसार विहित कार्यपद्धतीने ते कदाचित झालेही असते. (जल क्षेत्रातील बहुसंख्य कायद्यांना आज नियमच नाहीत आणि म्हणून काहीच विहित नाही ही खेदाची गोष्ट आहे)
     या पार्श्वभूमिवर मी आपणांस विनंती करतो की जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतानाच आपण राज्य जल परिषदेची त्वरित बैठक बोलवावी आणि त्या बैठकीत जल संपदा विभागाला एकदा सुक्ष्मदर्शक यंत्राखाली घ्यावे. श्वेतपत्रिका आवश्यक आहेच पण पुरेशी नाही.
      माझ्या ब्लॉगवर [jaagalyaa-thewhistleblower.blogspot.in]  सिंचन व्यवस्थापना संबंधी खूप तपशील उपलब्ध आहे. शासनाने त्याची दखल घ्यावी ही नम्र विनंती.
धन्यवाद.
आदराने,
आपला विश्वासू,

(प्रदीप पुरंदरे)



महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थापनाची दूर्दशा


प्रदीप पुरंदरे
BE (Civil) ME (WUM) स्वेच्छा-सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद.
                                    जलक्षेत्रातील मुक्त अभ्यासक, प्रशिक्षक व समुपदेशक
(सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन, पाणी वापर संस्था व सिंचन कायदे)
दूरध्वनी:०२४०-२३४११४२, मो. ९८२२५६५२३२, ८९८३५२८६४० ई-मेल: pradeeppurandare@gmail.com
बी-१२, प्राईड टॉवर्स, वेदांतनगर, तिवारी मंगल कार्यालयाजवळ, एम.आय.डी.सी. रेल्वे स्टेशन, औरंगाबाद ४३१००५
दिनांक ७ ऑगस्ट २०१२
प्रति,
) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य पदसिद्ध अध्यक्ष, राज्य जल परिषद
) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य पदसिद्ध अध्यक्ष, राज्य जल मंडळ
    विषय: महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थापनाची दूर्दशा /
          राज्य जल मंडळ व राज्य जल परिषदेची बैठक बोलावण्याबाबत
    संदर्भ: ) "सिंचन प्रकल्पांची दैना", दै.दिव्य मराठी, औरंगाबाद, दि...२०१२
         ) "फसवा जल लेखा", दै. लोकसत्ता, मुंबई, दि.२२..२०१२
         ) "काटेकोर व्यवस्थापनाची गरज", दै. महाराष्ट्र टाईम्स, औरंगाबाद, दि...२०१२
         ) "केवळ बंदोबस्त अन जुगाड", दै. महाराष्ट्र टाईम्स, औरंगाबाद, दि...२०१२
                  ) "पी.आय.पी." संदर्भातील जल संपदा मंत्र्यांना लिहिलेले पत्र, दि...२०१२
         ) "पाण्याचे गौडबंगाल उघड करणारे गेज रजिस्टर गायब? मांजरातील पाणीवाटप चौकशीचे प्रकरण",     
            दै. सकाळ, औरंगाबाद, दि...२०१२
                 (सुलभ संदर्भाकरिता क्र.१ ते ६ च्या प्रती सोबत जोडल्या आहेत)
         ) "लाभक्षेत्रे-कुरूक्षेत्रे" या सदरातील माझी लेखमालासाप्ताहिक आधुनिक किसान
             औरंगाबाद, ९ फेब्रुवारी २०१२ पासून
         jaagalyaa-thewhistleblower.blogspot.in  या माझ्या ब्लॉग वरील लिखाण
 महोदय,
       प्रारंभिक सिंचन कार्यक्रम म्हणजे पी.आय.पी. संदर्भातील जल संपदा विभागाची मार्गदर्शक तत्वे, अद्ययावत टॅंक चार्ट, अद्ययावत कपॅसिटी टेबल, त्या त्या प्रकल्पात प्रत्यक्ष मोजलेले बाष्पीभवन-व्यय, जलाशय व वितरण व्यवस्थेच्या त्या त्या प्रकल्पात प्रत्यक्ष मोजलेल्या कार्यक्षमता, अधिकृत करारनाम्यांवर आधारित बिगर सिंचनाची मागणी, अधिकृतरित्या मंजूर केलेला पीआयपी, स्थळ, काळ व परिस्थितीला न्याय देणारे पाणी-पाळीचे कार्यक्रम, प्रामाणिक जल लेखा आणि सिंचन कायदा या सर्वांआधारे आधारे राज्यातील बहूसंख्य सिंचन प्रकल्पात सिंचन व्यवस्थापन कसे होत नाही यावर संदर्भीय लेख, पत्र, बातमी, लेखमाला व ब्लॉग पुरेसा प्रकाश टाकतात असे वाटते. महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थापनाची आज दूर्दशा झाली आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. राज्य दुष्काळाच्या सावटाखाली असताना सिंचन व्यवस्थापनाची ही दशा मन विषण्ण करणारी आहे.
      २००५ साली विधिवत अस्तित्वात आलेल्या राज्य जल मंडळ व राज्य जल परिषदेची बैठक बोलावून पाणी प्रश्नावर एका व्यापक व सखोल विचार विनिमयाची प्रक्रिया वरील पार्श्वभूमिवर नव्याने सुरू करावी ही नम्र विनंती.

धन्यवाद.
आदराने,
आपला विश्वासू,

(प्रदीप पुरंदरे)
सोबत: वरील प्रमाणे
प्रत माहितीकरिता सविनय सादर
 मा. अध्यक्ष, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई
    


  






Wednesday, September 5, 2012

दुष्काळ - एक इष्टापत्ती!


दुष्काळ - एक इष्टापत्ती!

    महाराष्ट्रात या वर्षी दुष्काळ पडणार हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. या संकटाला एक इष्टापत्ती मानून त्यास सामोरे जाणे आणि दुष्काळ निवारणा बरोबरच दुष्काळ निर्मूलनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हाच एक मार्ग आता आपणा समोर आहे. एकीकडे जल-साठे वाढवणे आणि दूसरीकडे असलेले जल-साठे कार्यक्षम व समन्यायी पद्धतीने वापरणे हेच खरे, मूलभूत व दूरगामी उपाय आहेत. त्या दृष्टिने या लेखात सूत्ररूपाने काही मांडणी केली आहे.

) जून २०१३ पर्यंत हमखास पूर्ण होतील व येत्या पावसाळ्यात त्यात पाणी-साठा करता येईल असे बांधकामाधीन प्रकल्प (प्रामुख्याने लघु व मध्यम) युद्ध पातळीवर कालवा व वितरण व्यवस्थेसह पूर्ण करावेत. केवळ पॅकेजेस वर विसंबून न राहता त्या करिता लागणारा पैसा उभा करण्याकरिता खालील पर्यायांचा गांभीर्याने विचार व्हावा.
() शासनाने जल-रोखे काढावेत.
() विविध धर्म, जाती, पंथ यांच्या देवस्थानात व ट्रस्ट मध्ये प्रचंड प्रमाणावर सोनेनाणे व जडजवाहिर आज पडून आहे. त्या मृत गुंतवणुकीचा उत्पादक कामांसाठी उपयोग व्हावा या हेतूने शासनाने एक व्यवहार्य योजना तयार करावी. कोणाच्याही श्रद्धांचा अवमान आणि त्यांचे आर्थिक नुकसान न करता सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहभागाने त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात/तालुक्यात ही योजना विधिवत अंमलात आणावी.
() जल संकटाला एका अर्थाने वाळूचा अमर्याद  उपसा करणारे वाळू-माफिया जबाबदार असल्यामूळे त्यांच्या अवैध मालमत्ता शासनाने ताब्यात घ्याव्यात व त्यांचा लिलाव करून येणारा पैसा अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याकरिता वापरावा.
() विविध सहकारी संस्था, कारखाने, व्यापारी प्रतिष्ठाने वगैरेंनी काही प्रकल्प (पूर्णत: वा अंशत:) दत्तक घ्यावेत आणि आधुनिक व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाआधारे ते स्वखर्चाने पूर्ण करावेत.
() विविध बॅंकामधील  दावा न करण्यात आलेला (अन-क्लेम्ड) पैसा प्रस्तुत कामाकरिता वापरता येईल का हे तपासून पहावे.
() मध्यम वर्गावर समाजाचे प्रबोधन करण्याची नैतिक जबाबदारी असते. चंगळवादात अडकलेला मध्यम वर्ग आता ती जबाबदारी पार पाडेनासा झाला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर मध्यम वर्गाने अंतर्मूख व्हावे. पाणी या विषयाकडे त्याने केलेल्या दूर्लक्षा बाबत आपणहून प्रायश्चित्त घ्यावे. प्रत्येक मध्यम वर्गीय कुटूंबाने किमान अर्धा ग्रॅम सोने प्रस्तुत कामाकरिता शासनाकडॆ देणगी म्हणुन द्यावे. शासनाने त्याकरिता विशिष्ट ऎच्छिक स्वरूपाची योजना तयार करावी.

) पूर्ण झालेल्या पण यावर्षी पाण्याअभावी कोरडया पडलेल्या प्रकल्पातील गाळ (विशेषत: उपयुक्त जल-साठयातील) काढावा. टेल पर्यंत पाणी जाण्यास अडथळा ठरणा-या कालव्यावरील नादुरूस्त कामांची दुरूस्ती करावी. लोकसहभाग व प्रायोजकत्वाच्या तत्वाने हे काम करावे. शासनाने त्याकरिता खर्च करू नये. देवधर्म, लग्न-मुंजी, सणवार, साहित्य संमेलने या सारख्या कार्यक्रमांवर खर्च होणारा पैसा या वर्षी अशा कामांकडे वळवला जावा. खासदार व आमदारांच्या निधीतूनही कामे करता येतील. नागरी भागातील विहिरींबाबत तसेच वर्षा-जल संचयासाठीही (रेन वॉटर हार्वेस्टिंग) हे धोरण अंमलात आणता येईल.

) पाण्याच्या चंगळवादी वापरावर कठोर निर्बंध आणावेत. मद्य, बियर, शितपेये, जल क्रिडा (वॉटर स्पोर्टस) वगैरे करिता पाणी देऊ नये

) टॅंकरने पाणी पुरवठा करणे व बाटलीबंद पाणी ( बॉटल्ड वॉटर) या दोन्ही प्रकारांबाबत तुटीचे वाटप व पाण्याचे रेशनिंग या करिता नवीन नियमावली/कार्यपद्धती तयार करण्यात यावी.

) जलक्षेत्रात आज कायद्याचे राज्य नाही. ते आणण्यासाठी खालील गोष्टी पूर्ण करण्याकरिता धडक मोहिम हाती घ्यावी
() महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम,१९७६(.पा..७६) चे नियम तयार करणे; नदी-नाले, लाभक्षेत्र, उपसा सिंचन, इत्यादिच्या अधिसूचना काढणे; पाणी चोरी व पाणीनाशाबद्दल गुन्हे दाखल करणे व त्याबाबत कालवा अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करणे; विभागीय मुख्य अभियंत्यांनी "मुख्य नियंत्रक प्राधिकारी" या नात्याने आपली कायदेशीर भूमिका म.पा..७६ मधील कलम क्र.७ अन्वये पार पाडणे
() महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्रधिकरण(..नि.प्रा.) अधिनियम,२००५ या कायद्यातील खालील मूलभूत तरतुदींची ताबडतोब अंमलबजावणी करणे
) नदीखोरे अभिकरणे, राज्य जल मंडळ, व राज्य जल परिषद कार्यान्वित करणे आणि एकात्मिकृत राज्य जल आराखडा तयार करणे
) नदीखो-यातील पाण्याची तूट समप्रमाणात विभागणे व खालच्या धरणांसाठी वरच्या धरणातून (किमान पिण्यासाठी तरी) पाणी सोडणे
) बारमाही पिकांना ठिबक किंवा तुषार सिंचन बंधनकारक करणे
) तुटीच्या वर्षात लाभक्षेत्रातील जमीनधारकांना किमान एक एकर जमिनीसाठी पाणी देणे
.) सिंचन-अनुशेषग्रस्त जिल्हे व विभागाच्या बाबतीत विशेष जबाबदारी पार पाडणे
) सर्वसमावेशक जलहवामानशास्त्रीय माहिती यंत्रणा उभारणे
) पाण्याचे सूयोग्य संधारण व व्यवस्थापन करण्याच्या पद्धतींचे प्रचालन व अंमलबजावणी करणे
    ) पाणी वापरासंबंधीची आधारसामग्री निर्माण करणे
    ) पिण्याचे व घरगुती वापराचे पाणी आणि औद्योगिक पाणी पुरवठा यांचे नियमन करणे व त्याकरिता विनियामक व प्राथमिक विवाद निवारण अधिकारी नेमणे; विविध उद्योगांकरिता करण्यात आलेले जल-आरक्षण त्या त्या उद्योगांना लागणा-या प्रक्रिया-जलाच्या (प्रोसेस-वॉटर) प्रमाणात आहे की नाही हे तपासून पहाणे व जास्तीचे पाणी येत्या रब्बी हंगामात उद्योगांकडून शेतीकडे वळवणे.
    पाण्याचा व्यापारा संदर्भातील अनावश्यक व अनाठायी कार्यवाही थांबवून  
    ..नि.प्रा.ने या दुष्काळी वर्षापासून तरी निदान वर नमूद केलेल्या कामात "अर्ध-
    न्यायिक स्वायत्त नियमन प्राधिकरण" या त्यांच्याकडून मूळात अभिप्रेत असलेल्या
    भूमिकेस न्याय देत लक्ष घालावे. अन्यथा, राज्यपालांनी म..नि.प्रा.स त्याबाबत
    आदेश द्यावेत.
() महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतक-यांकडून व्यवस्थापन (मसिंपशेव्य) अधिनियम, २००५ या कायद्यानुसार उपसा सिंचन योजनांकरिता पाणी वापर संस्था स्थापन करणे
() मसिंपशेव्य कायद्यानुसार स्थापन झालेल्या प्रवाही सिंचन पाणी वापर संस्थांच्या अडचणी वाल्मी तसेच इतर व्यासपीठांवरून अनेक वर्षे मांडल्या जात आहेत. त्याबाबत शासनस्तरावर तात्काळ निर्णय घेणे

) ज्या सिंचन प्रकल्पात जलसाठा उपलब्ध आहे त्या प्रकल्पात प्राथमिक सिंचन कार्यक्रम व पाणी-पाळ्यांचे नियोजन आणि एकूणच सिंचन व्यवस्थापन लोकाभिमुख पद्धतीने व्हावे. जेथे शक्य असेल तेथे किमान एक दोन पाणी-पाळ्या तरी शेती करिता द्याव्यात. त्याचे नियोजन कमी पाणी लागणारी पिके व त्या पिकांची अवस्था (क्रिटिकल ग्रोथ स्टेज) लक्षात घेऊन वाल्मीच्या सहाय्याने करावे. वाल्मीने या वर्षी "दुष्काळातील जल नियोजन" या एका विषयावरच फक्त लाभक्षेत्रात जाऊन प्रशिक्षण वर्ग घ्यावेत. कृषि विद्यापीठे व विज्ञान केंद्रांनीही त्यात सहभागी व्हावे.

) जलाशयातील गाळ, बाष्पीभवन, गळती; कालव्यातील प्रवाह व वहनव्यय; आणि भिजलेले क्षेत्र सर्व प्रकल्पात प्रत्यक्ष मोजण्याची व्यवस्था या वर्षापासून तरी व्हावी

) वाल्मीने प्रस्तावित केलेले आणि म..नि.प्रा.ने जलदर निश्चिती करताना वापरलेले कालवा देखभाल-दुरूस्ती निधी संदर्भातील सुधारित निकष शासनाने अधिकृतरित्या स्वीकारावेत व त्यानुसार कालवा देखभाल-दुरूस्ती निधी या वर्षापासून प्रत्यक्ष द्यावा.

) कालवा देखभाल-दुरूस्तीकरिता जल संपदा विभागाने येत्या सहा महिन्यात मॅन्युअल तयार करावे. अंतरिम व्यवस्था म्हणून १ ऑक्टोबर पूर्वी कालवा देखभाल-दुरूस्तीची मार्गदर्शक तत्वे विशद करणारा तांत्रिक शासन निर्णय (टेक्निकल जी.आर.) काढावा.

१०) पाणी वापर संस्था, उपसा सिंचन व बिगर सिंचना करिता करारनामे करण्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी.

११) महाराष्ट्र जलसंपत्ती विकास केंद्रातर्फे (..वि.कें.) आजवर झालेल्या तपासणीचा/पाहणीचा तपशील पूर्तता अहवालांसह (ॅक्शन टेकन रिपोर्ट) जाहीर करावा. ..वि.कें. ने या वर्षी उपरोक्त तपासणी/पाहणी वर विशेष भर द्यावा. पाणी व क्षेत्र न मोजता करण्यात येत असलेल्या जललेखा वा बेंचमार्किंग वर वेळ वाया न घालवता या वर्षी फक्त उपरोक्त पाहणी अहवालच तयार करावा व तो १ जून २०१३ पूर्वी जाहीर करावा.

) मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षते खाली राज्य जल परिषद आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य जल मंडळ २००५ सालीच अस्तित्वात आले आहे. त्यांची एकही बैठक अद्याप झालेली नाही. दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर दोहोंच्या बैठका आयोजित कराव्यात आणि त्यात राज्यातील दुष्काळावर तपशीलवार चर्चा व्हावी.

१३) वरील गोष्टी खरेच अंमलात आणायच्या असतील तर जल संपदा विभागाच्या दोन्ही सचिवपदी तसेच सचिव दर्जाच्या अन्य ७ पदांवर त्वरित आय..एस.अधिका-यांची नेमणूक करावी. मुख्य नियंत्रक प्राधिकारी म्हणून कायदेशीर जबाबदारी पार न पाडणा-या मुख्य अभियंत्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी
 [Published in Weekly "Aadhunik Kisan", Aurangabad, 6 -12 Sept. 2012]

Wednesday, August 29, 2012

जनवादी लोकवैज्ञानिक भूमिकेतून जल व्यवस्थापन


जल वास्तव -१५
जनवादी लोकवैज्ञानिक भूमिकेतून जल व्यवस्थापन
    सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय सिंचन प्रकल्पांचे जनवादी लोकवैज्ञानिक भूमिकेतून जल व्यवस्थापन शक्य आहे. त्याबद्दल पी.आय.पी.चे एक काल्पनिक उदाहरण देऊन काही मुद्दे या लेखात मांडले आहेत. वास्तवातील एखाद्या प्रकल्पाच्या पीआयपीशी या उदाहरणात साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा.

      महाराष्ट्रातला एक मोठा सिंचन प्रकल्प. रब्बी हंगामाच्या सुरूवातीलाच पाणी टंचाई स्पष्ट झाली आहे. १५ ऑक्टोबरला जलाशयात ४१% उपयुक्त साठा आहे. फक्त टक्केवारी वरून नेहेमी पूर्ण कल्पना येतेच असे नाही. प्रकल्प मोठा असल्यामूळे ४१% उपयुक्त साठा म्हटले तरी २५२ दलघमी पाणी उपलब्ध आहे. त्यातून बरेच काही होऊ शकते - जाणीवपूर्वक प्रयत्न झाले तर!

      सोबत एक तक्ता दिला आहे. त्यात प्राप्त परिस्थितीत वरील प्रकल्पात शासकीय नियोजन आणि जनवादी-लोकवैज्ञानिक नियोजन यांची तुलना केली आहे. त्यावरून असे दिसते की, जनवादी-लोकवैज्ञानिक नियोजन केले तर उपलब्ध पाण्यात शासकीय नियोजनाच्या तुलनेत सिंचन क्षेत्र बरेच वाढू शकते. लक्षणीयरित्या जास्त लाभधारकांना सिंचनाचा लाभ मिळू शकतो. समन्यायाच्या दिशेने चार पावले अडखळत का होईना टाकली जाऊ शकतात. थोडा तपशील पाहू. जनवादी-लोकवैज्ञानिक हस्तक्षेपाच्या  शक्यता त्यातून कदाचित स्पष्ट होतील.

         प्रकल्प ४० वर्षे जुना आहे. शासनानेच केलेल्या अभ्यासानुसार जलाशयातील उपयुक्त साठयात देखील गाळाचे अतिक्रमण झाले आहे. पण प्रकल्पाच्या संबंधित अधिका-यांनी तो तपशील विचारात न घेता पाण्याचे नियोजन(!) केले आहे. त्याचा परिणाम असा होतो की, गाळाला पाणी समजले जाते. उपलब्ध पाणी जास्त आहे असा आभास निर्माण होतो. त्यानुसार विविध वापरांकरिता पाणी कबूल केले जाते. आणि हंगाम अर्धा संपल्यावर "अचानक" पाणी टंचाई निर्माण होते. शहरातले लोक म्हणतात शेतीकरिता जास्त पाणी वापरले! अशा प्रकरणांबाबत विधानसभेत प्रश्न विचारले गेले आहेत. काही अधिका-यांवर "कारवाई" सुद्धा झाली आहे. पण एकूणच हम नही सुधरेंगे असा प्रकार आहे. प्रस्तुत उदाहरणात जनवादी-लोकवैज्ञानिक नियोजनात शासनाच्याच अभ्यासा आधारे गाळाचा विचार केला आहे.

       शासकीय नियोजनात ४० वर्षांपूर्वीच्या प्रकल्प अहवालातील बाष्पीभवनाचा आकडा पकडला आहे. तो जलाशय पूर्ण भरला तरचा आहे. प्रस्तुत उदाहरणात जलाशयात फक्त ४१% पाणी उपलब्ध आहे. साहजिकच जलाशयातील पाण्याची पातळी खूप खाली आहे. पाण्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळही कमी आहे. त्यामूळे बाष्पीभवनाचा दर जरी तोच धरला तरी एकूण घनफळ बरेच कमी येते. शासकीय नियोजनात ही चूक अनवधानाने झाली असे म्हणायचे का? केवळ गृहितातील "चुकी"मूळे ३३ दलघमी पाणी गायब झाले. जनवादी-लोकवैज्ञानिक नियोजनात प्रत्यक्ष जलसाठयाच्या प्रमाणात बाष्पीभवन पकडून शेतीकरिता जास्त पाणी "उपलब्ध" करून दिले आहे.

      शासकीय नियोजनात करारनाम्यानुसार बिगर सिंचनासाठी पाण्याची गरज लक्षात घेतली गेली आहे. पाणी टंचाई सर्वांकरिता आहे, तिचेही समन्यायी वाटप व्हायला हवे, फक्त शेतक-यांनाच टंचाईची झळ बसू नये अशा भूमिकेतून जनवादी-लोकवैज्ञानिक नियोजनात बिगर सिंचनात १५% कपात केली आहे. ती ऑक्टोबर पासून आहे. त्यामूळे शहरवासीयांच्या मनाची तयारी होईल. त्यांना पाणी बचतीची सवय लागेल. ऎन उन्हाळ्यात शॉक ट्रिटमॆंट देऊन आक्रस्ताळेपणाला व उथळ राजकारणाला वाव देण्याऎवजी वस्तुस्थिती प्रथमच स्पष्ट करणे कधीही चांगले. शेवटी, पैशा प्रमाणेच पाण्याचेही सोंग आणता येत नाही!

     या वर्षीच्या उपयुक्त पाणी साठयातून काही पाणी पुढच्या वर्षाकरिता राखून ठेवण्याची प्रथा आहे. त्यास निभावणीचा साठा (कॅरी ओव्हर) असे म्हणतात. पुढच्या वर्षी पावसाने ताण दिला तर एक दोन पाणी-पाळ्या खरीपातील पिकांना देता याव्यात हा त्यामागचा हेतू. तो अर्थातच चांगला आहे. पण स्थळ, काळ व परिस्थिती लक्षात घेऊन तारतम्यही वापरले पाहिजे. या वर्षीच पाणी फार कमी असताना जे आहे ते आत्ता देत नाही, पुढच्या खरीपात देतो असे म्हणणे योग्य नाही. अशा "राखून" ठेवलेल्या पाण्याची चोरी किंवा वाफच होणार हे उघड आहे. शासकीय नियोजनात निभावणीचा साठा टंचाईच्या वर्षात देखील गृहित धरला आहे. जनवादी-लोकवैज्ञानिक नियोजनात तसे न करता निभावणीचा पूर्ण साठा (२८.३१ दलघमी) या वर्षीच वापरायचे प्रस्तावित आहे.

      बाष्पीभवन व निभावणीचा साठा याबद्दलची गृहिते "चुकल्यामूळे" शासकीय नियोजनातून एकूण ६१.३१ दलघमी (.१६ टिएमसी!) पाणी गायब झाले आहे. हे प्रमाण भयावह आहे. प्रादेशिक अनुशेषाच्या संदर्भात एक-एक टिएमसी पाण्यावरून रणकंदन होते. येथे एकाच प्रकल्पात २ टिएमसी पाणी केवळ "योग्य"गृहिता आधारे चोरण्याची सोय केली आहे.

     शासकीय नियोजनात  कृषि विद्यापीठाकरिता करारनाम्यानुसार पाणी आरक्षण करण्यात आले आहे. पाणी टंचाईच्या वर्षात कमी पाण्यात शेती कशी करायची याचा वस्तुपाठ खरेतर विद्यापीठाने घालुन दिला पाहिजे. प्रत्यक्ष कृतिद्वारे केलेले ते प्रशिक्षण शेतक-यांकरिता मार्गदर्शक ठरेल. या हेतूने जनवादी-लोकवैज्ञानिक नियोजनात कृषि विद्यापीठाच्या पाण्यात कपात केली आहे.
      थोडक्यात, जनवादी-लोकवैज्ञानिक नियोजनाद्वारे उजव्या कालव्यावरील सिंचना करिता शासकीय नियोजनापेक्षा दुप्पट पाणी उपलब्ध होऊ शकते. आता तक्त्यात दिलेली पिक रचना गृहित धरली, पिकांच्या मूळांशी पाण्याची गरज शास्त्रीय पद्धतीने काढली आणि प्रकल्पाची एकूण कार्यक्षमता ३५% पकडली तर उजव्या कालव्यावरील सिंचन क्षेत्रात लक्षणीय वाढ शक्य आहे. प्रस्तुत लेखात विस्तारभयास्तव डाव्या कालव्याचा तसेच आधुनिक पद्धतीचा तपशील दिलेला नाही. जिज्ञासूंकरिता त्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते.

     पिके व पिकांखालचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी शासकीय नियोजनात जुनी, कालबाह्य व अशास्त्रीय पद्धत वापरली आहे. एवढेच नव्हे तर अनेक वर्षांपूर्वी प्रकल्प "आठमाही" म्हणून घोषित झाला असताना ऊसाला पाणी दिले आहे. तो ऊसही मूळात विहिरीवरील ऊस आहे. विहिरीवरील ऊसाची जबाबदारी - ती ही तीव्र पाणी टंचाई असताना - शासनाने घ्यायची गरज नाही. ऊसाऎवजी इतर पिकांना पाणी दिले तर शासकीय नियोजनातील पाणी उपलब्धतेतही सिंचनाखालचे क्षेत्र वाढू शकते. जास्त शेतक-यांना पाणी मिळू शकते.

      सार्वजनिक क्षेत्रातील राज्यस्तरीय सिंचन प्रकल्पांचे जनवादी लोकवैज्ञानिक भूमिकेतून जल व्यवस्थापन शक्य आहे. आवश्यकही आहे. पण ते प्रत्यक्षात आणणे अवघड आहे. कारण त्यासाठी प्रकल्पस्तरावर सातत्यपूर्ण हस्तक्षेप  आणि प्रसंगी संघर्ष करावा लागेल. तो करण्यासाठी काय करता येईल याबद्दल विचार करणे गरजेचे आहे असे वाटते.

   जल नियोजन: शासकीय विरूद्ध जनवादी-लोकवैज्ञानिक                                                                        
                   ( .क्र.१ ते ५ मधील आकडे दशलक्ष घनमीटर - दलघमी- मध्ये)
अ क्र

      तपशील
शासकीय नियोजन
जनवादी नियोजन
जनवादी नियोजना संदर्भातील शेरा
१५ ऑक्टोबरचा प्रत्यक्ष उपयुक्त जलसाठा
२५२
२५२
तीव्र पाणी टंचाईमूळे उपयुक्त जलसाठा फक्त ४१% एवढाच आहे.
वजावट:




() उपयुक्त जलसाठयात   
   गाळाचे अतिक्रमण
शून्य
२४
 उपलब्ध अधिकृत अभ्यासानुसार गाळाचे अतिक्रमण गृहित धरले आहे.

() बाष्पीभवन
५६.६३
२३
प्रत्यक्ष उपलब्ध जलसाठा आणि त्यानुसार पाणी पातळी व क्षेत्रफळ धरले आहे.

() बिगर सिंचन
७८.८६
६७
पाणी टंचाई म्हणून १५% कपात केली

() निभावणीचा साठा
२८.३१
शून्य
 सर्व उपलब्ध पाणी वापरले आहे.

() कृषि विद्यापीठाचे
   आरक्षण
११.
.५५
पाणी टंचाई म्हणून विद्यापीठाच्या पाण्यात  कपात केली आहे.

() एकूण वजावट
१७४.
१२०.५५

कालवामुखाशी सिंचना करिता उपलब्ध पाणी
७७.१०
१३१.४५

डाव्या कालव्यावरील सिंचनाकरिता पाणी
११.
१८.
कालवामुखाशी सिंचना करिता उपलब्ध पाण्याच्या (/)
उजव्या कालव्यावरील सिंचनाकरिता पाणी
६६.
११२.६५
केवळ गृहिते बदलली म्हणून पाण्याची उपलब्धता लक्षणीयरित्या वाढली.
उजव्या कालव्यावरील प्रस्तावित सिंचित क्षेत्र (हेक्टर)
८५१५
११०८२
आधुनिक शास्त्रीय पद्धत वापरली. सिंचन क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली.
प्रस्तावित पिके
विहिरीवरील ऊस(२१५२ हे.), ज्वारी, हरभरा, मका
मिरची, तेलबिया, ज्वारी, हरभरा, चारा, भाजीपाला, गहू
या उदाहरणातील प्रकल्प आठमाही सिंचन प्रकल्प म्हणून पूर्वीच घोषित झाला आहेसुधारित प्रकल्प अहवालानुसार पिक रचना गृहित धरली आहे. पिकांच्या मूळाशी पाण्याची गरज शास्त्रीय पद्धतीने काढली आहे.प्रकल्पाची एकूण कार्यक्षमता ३५% पकडली आहे.

[Published in Weekly "Aadhunik Kisan", Aurangabad, 30 Aug-5 Sept.2012]