Friday, April 13, 2012

(6) मसिंपशेव्य अधिनियम,२००५ : अंमलबजावणीचा आजवरचा अनुभव



लाभक्षेत्रे - कुरूक्षेत्रे
"विधि"लिखित - "जल-वास्तव" -  "जल-स्वप्न"
-- प्रदीप पुरंदरे
भाग १. - "विधि"लिखित
  मसिंपशेव्य अधिनियम,२००५ : अंमलबजावणीचा आजवरचा अनुभव
      २००५ साली जागतिक बॅंकेंच्या मदतीनं सुरू झालेल्या महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पांत [..सु.प्र.]  एकूण २८६ प्रकल्पांचा [मोठे - ११, मध्यम -१२, लघु-२६३] समावेश करण्यात आला आहे. या २८६ प्रकल्पात मसिंपशेव्य अधिनियम,२००५ लागू करण्यात आला असून त्याबद्दल विविध व्यासपीठांवर मोठया प्रमाणावर साधक बाधक चर्चा सुरू झाली आहे. बांधकामाधीन प्रकल्पांतही या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी त्याबाबत तपशीलानं फारशी चर्चा अजून होताना दिसत नाही. त्यामूळं या लेखात प्रामुख्यानं म..सु.प्र.मधील कायद्याच्या अंमलबजावणीबाबत मांडणी केली आहे.
            ..सु.प्र. अंतर्गत २८६ प्रकल्पांच्या ६.७ लक्ष हेक्टर लाभक्षेत्रात एकूण १५४५ पाणी वापर [पा.वा.] संस्थांची स्थापना नवीन कायद्यानं करण्यात आली आहे. या पा.वा. संस्थांचा सहभाग घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील चा-यांच्या पुनर्स्थापनेचं काम बहुतांशी पूर्ण झाले असून जल-व्यवस्थापनाच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेनं आता वेग घेतला आहे. या पा.वा.संस्थांचं मूल्यमापन करण्याची वेळ अद्याप आलेली नाही. मूल्यमापन करण्यापूर्वी त्यांना काम करण्यासाठी पुरेसा अवधी देणं उचित होईलपण एक मात्र आवर्जून सांगितलं पाहिजे की ज्या प्रकल्पात नवीन कायदा लागू नाही तेथील अनेक लाभधारक व पा.वा. संस्था अशी मागणी करता आहेत की आम्हालाही नवीन कायदा लागू करा. अशी मागणी होणं ही एका अर्थानं नवीन कायद्याला मिळालेली पावती आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.  [महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ बद्दलही अशी मागणी करण्यासारखी परिस्थिती लवकरच निर्माण होईल अशी आशा आपण करूयात.] दरम्यान, विविध स्तरांवरील अधिकारी व पा. वा. संस्थांचे पदाधिकारी यांनी वेळोवॆळी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मांडलेल्या भूमिकांतून कायद्याच्या अंमलबजावणी बद्दल खालील महत्वाच्या गोष्टी जाणवतात. त्याची गंभीर दखल त्वरित घेऊन योग्य ते बदल झाल्यास / त्रुटी दूर केल्यास कायद्याची अंमलबजावणी अजून चांगली होईल असा विश्वास वाटतो.
                                     




                   _________________________________
कायदा व नियमांच्या चांगल्या अंमलबजावणीकरिता खालील बाबींची खात्री करा:
*लाभक्षेत्राचे म.पा..७६ अन्वये अधिसूचितीकरण झालेलं आहे ना?
* संस्थेच्या कार्यक्षेत्रातून एन. . क्षेत्र वगळलं आहे ना?
* पाण्याची प्रत्यक्ष उपलब्धता काटेकोरपणे तपासली आहे ना?
* प्रवाही व उपसा अशा दोन्ही प्रकारे एकाच क्षेत्राला फायदा मिळत नाही ना?
* संस्था व शासन आणि / किंवा संस्थांनी आपसात वेळीच विहित नमुन्यात करार केला आहे ना?
_____________________________________________________

कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी:
) पा.वा.संस्थांच्या कार्यक्षेत्राची निश्चिती करताना  मसिंपशेव्य नियम,२००६ (जोडपत्र-) मधील मार्गदर्शक तत्वे काटेकोरपणे विचारात घेतली गेली का याबद्दल शंका आहेत. उदाहरणार्थ,
    () पा.वा.संस्थेस हस्तांतरित केलेलं लाभक्षेत्र महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम-३ अन्वये प्रथम अधिसूचित केलं गेलं आहे ना? नसल्यास, जे क्षेत्र कायद्यानं जल संपदा विभागाकडं नाही ते बेकायदा हस्तांतरित केल्यासारखे होईल. उद्या संभाव्य न्यायिक प्रक्रियेत जल संपदा विभागाची नाचक्की होईल.
    () शासनानं अधिकृतरित्या अ-कृषि [एन ए] केलेलं क्षेत्र पा.वा.संस्थेच्या अधिसूचनेतून रितसर वगळले ना? पाणी वापर ह्क्क क्षेत्राच्या प्रमाणात असल्यामूळे जेथे शेती होणार नाही तेथील पाणी त्याच लाभक्षेत्रात अन्यत्र शेतीकरिता देता येईल. शेतीकरिता पाण्याची एकूण उपलब्धता कमी होत असताना एन ए क्षेत्राचा काटेकोर हिशेब लावल्यास लाभक्षेत्रातील बाकीच्या क्षेत्राला थोडं जास्त पाणी देता येईल. एकरी फार कमी पाणी आज शेतीकरिता उपलब्ध असल्यामूळं या खाचाखोचा  महत्वाच्या आहेत. हे दात कोरून पोट भरणं नव्हे!
    () प्रवाही व उपसा सिंचनाची लाभक्षेत्रं स्वतंत्र आहेत ना? ती स्वतंत्ररित्या / वेगवेगळी अधिसूचित झाली आहेत ना? काही भागांना अज्याबात पानी भेटना अशी परिस्थिती असताना काही भागाला मात्र दुहेरी फायदा मिळावा हे समन्यायाला धरून नाही. त्यानं जललेखा व बेंचमार्किंगही चुका होतील. (दोन वेगवेगळया प्रकल्पांचा संबंध येत असेल तर अजूनच घोटाळा! उदाहरणार्थ, जायकवाडीच्या जलाशयातून उपसा करून मुळा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सिंचन होतं. काय करणार जललेखा अन् कसा काढणार  सिंचनाचा विभागीय अनुशेष?)
    () प्रकल्पनिहाय प्रत्येक पा.वा.संस्थेचा पाणी वापर हक्क निश्चित करताना  पाण्याची प्रत्यक्ष उपलब्धता काटेकोरपणे तपासली आहे ना? नाहीतर सर्व कुटाणे करून, जागतिक बॅंकेचं कर्ज काढून कामं करायची, पा.वा.संस्था स्थापन करायची अन् पूर्ण लाभक्षेत्राच्या सिंचनाकरिता किमानसुद्धा पाणी नाही असं व्हायचं. टेलच्या लोकांनी पाणी मिळेल या आशेनं पा.वा.संस्था स्थापन केल्या आहेत.खरीप व रब्बी हंगामात किमान भूसार पिकांना तरी पाणी मिळणार का त्यांना? कोटयावधीचा खर्च करण्यापूर्वी मूळात पाण्याची खात्री केली आहे ना?
) "पा.वा.संस्थेची स्थापना - स्थापना झाल्यापासून ३ महिन्यांच्या आत पा.वा.संस्थेबरोबर करार - कराराच्या दिनांकापासून त्या करारान्वये ३ महिन्यात संयुक्त पाहणी - संयुक्त पाहणीच्या दिनांका पासून १ महिन्यात पुनर्स्थापनेच्या कामांचा तपशील ठरवायचा - संयुक्त पाहणीच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत पुनर्स्थापनेची कामं करून द्यायची - झालेल्या कामांची चाचणी घ्यायची - पाणी सर्वत्र पोहोचतं आहे याची खात्री करायची - त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करायच्या - जल व्यवस्थापनाकरिता करारातील तपशीलानुसार प्रत्यक्ष हस्तांतरण करायचं" अशी एकूण सुनियोजित व  कालबद्ध प्रक्रिया कायद्याच्या कलम २१,२२ व २९ नुसार अपेक्षित आहे. या सर्वाचा पाया  अर्थातच करार हा आहे. करारच वेळेवर झाला नाही तर? सगळचं मुसळ केरात!आणि दुर्दैवानं तसंच झालं. कराराचा मसुदा विहित करायला शासनानं तीन वर्षं लावली. तो पर्यंत पा.वा.संस्था स्थापन होऊन ३ वर्षं झाली. करार न होताच "करारानुसार" कामं सुरू झाली. पा.वा.संस्थेच्या ज्या अध्यक्षाच्या काळात कामं सुरु झाली त्याचा कार्यकाळ संपून गेला. तो जबाबदार नाही. कारण त्याच्या काळात करारच झाला नाही. ज्याच्या काळात करार झाला तो ही जबाबदार नाही कारण कामं अगोदरच झाली. लोक सहभागाला एक अधिकृत स्वरूप देण्याकरिता जो करार हवा त्यालाच लै उशीर झाल्यामूळं एका चांगल्या संकल्पनेचा अक्षरश: बोजवारा उडाला.हे प्रकरण एवढयावरच संपत नाही. खरी मजा पुढेच आहे. तीन वर्षांच्या विलंबित कालावधीत शासनानं जागतिक बॅंकेपुढे अगतिक होऊन कायद्या व नियमांना वेगळी प्रक्रिया अभिप्रेत असतानादेखील वितरिका, कालवा व प्रकल्पस्तरांवरही घाईगडबडीत पा.वा.संस्था स्थापन करायचा धुमधडाका सुरू केला. आता कायदा म्हणतो की वरच्या पातळीवर संस्था असेल तर तिनं खालच्या पातळीवरील संस्थेशी करार करायचा.शासनानं फक्त वरच्या पातळीवरील संस्थेशी करार करायचा. पण आज तरी असं झालेलं दिसत नाही. शासनच एकदम तळाच्या संस्थांशी करार करत आहे -मधल्या संस्थांना डावलून, त्यांचा कायदेशीर हक्क नाकारून, नको ती जबाबदारी स्वीकारुन. असं का? तर वरच्या पातळीवरच्या संस्थांशी जे करार करायचे त्यांचे मसुदे तयार नाहीत.
     शीतावरून भाताची परीक्षा होते. अजून बरंच काही सांगता येईल.पण ते पुन्हा कधीतरी. नुसता कायदा चांगला असून भागत नाही. अंमलबजावणीचा तपशील महत्वाचा. खरं तर विविध व्यासपीठांवरून हा आणि अन्य तपशील शासनापुढे वेळोवेळी मांडण्यात आला आहे. जाणकारांकरिता त्यात नवीन काही नाही. पण आजही "बांधकामाधीन" मानसिकतेत असणा-या उच्चपदस्थांना जल-व्यवस्थापनाचे वरील मुद्दे भावत नाहीत. उमजले तरी रुचत नाहीत. कळले तर वळत नाहीत. प्रत्यक्ष प्रकल्पावर, क्षेत्रावर जल व्यवस्थापनाचं काम करणा-या अधिका-यांना / कर्मचा-यांना व पा.वा.संस्थेच्या पदाधिका-यांना आज जलक्षेत्रात दुय्यम दर्जाचं नागरिकत्व देण्यात आलं आहे. ते खरं तर खूप महत्वाच्या सूचना करतात. कायदा व नियमात व्यवहार्य सुधारणा सूचवितात. उदाहरणार्थ, खालील सूचना / शिफारशी त्या "दुय्यम दर्जाच्या नागरिकांनी" केलेल्या आहेत. त्याची दखल "बांधकामाधीन" मंडळीनी आजवर घेतलेली नाही. जलक्षेत्रातले इतर जाणकार त्याची दखल घेतील का?
__________________________________________________
महत्वाच्या शिफारशी अंमलात आणा
* पा.वा. संस्थांच्या सभासदत्वाचे निकष व्यवहार्य करा
* महिलांना सह - सदस्यत्व द्या
* शेतीच्या पाण्याची विक्री व हस्तांतरण करू नका
* प्रवाह मापकांची एकूण व्यवस्था लवकर व नीट बसवा
* संस्थेच्या कार्यक्षेत्रातील जमीनी एन.. करताना संस्थेचा
      व जल संपदा विभागाचा ना हरकत दाखला आवश्यक करा
___________________________________________________
  
"दुय्यम दर्जाच्या नागरिकांनी" केलेल्या सूचना / शिफारशी:
) पा.वा. संस्थांच्या शासनानं निश्चित केलेल्या कार्यक्षेत्रात ज्या लाभधारकांची नावं सात-बारावर आहेत ते सर्वजण नवीन कायद्यानुसार संस्थेचे सभासद मानले जातात. सात-बारावर ज्याचं नाव आहे तो लाभक्षेत्रात प्रत्यक्षात राहतो, शेती कसतो व सिंचनाचा खरंच लाभ घेतो असं असतंच असं नाही. पण केवळ सात-बारावर नाव आहे म्हणून सदस्य या प्रकारामूळं संस्थेच्या सभासदांची यादी विनाकारण खूप मोठी होते. दैनंदिन व्यवहारात ती त्रासदायक ठरते. म्हणून संस्थेच्या अधिकृत कार्यक्षेत्रात पाणी-भाग (वॉटर शेअर) विकत घेऊन प्रकल्पाचं पाणी वापरून बागायती शेती करणा-यांनाच फक्त संस्थेचं सभासदत्व द्यावं.
) नवीन कायद्यात महिलांकरिता आरक्षण आहे. त्यानुसार  संचालक म्हणून निवडून आलेली  महिला - सभासद तत्वत: संस्थेची अध्यक्ष होऊ शकते. पण मूळात संस्थेची सभासद होण्याकरिता महिलेच्या नावावर शेती पाहिजे. आणि बहुदा तीच नसते. त्यामूळं महिलांकरिताचं आरक्षण कागदावरच राहतं. ते खरंच प्रत्यक्षात आणण्याकरिता सात-बारावर नाव असो अथवा नसो महिलांना पा.वा.संस्थेत सह - सदस्यत्व द्यावं. त्यासाठी कायद्यात आवश्यक ती सुधारणा करावी.
) उपसा सिंचन नवीन कायद्याच्या कक्षेत आणण्याकरिता उपसा सिंचन पा.वा. संस्था लगेच स्थापन कराव्यात. त्यांचं कार्यक्षेत्र निश्चित करून त्यांचे पाणी वापर हक्क जाहीर करावेत.जललेखा ठेवणं त्यांना बंधनकारक करावे. उपसा सिंचना करिता घनमापनावर आधारित पाणीपट्टीचा स्वतंत्र दर जाहीर करावा.
) पाणी वापर हक्क फक्त पा. वा. संस्थांच्या पातळीवरच असावा. वैयक्तिक लाभधारकांना पाणी वापर हक्क देणे अव्यवहार्य आहे. पाणी वापर हक्कांची विक्री व हस्तांतरण यांस कायद्यानं बंदी असावी. ..नि.प्रा. कायद्यात त्या अनुषंगानं त्वरित बदल करावेत.
) पा.वा.संस्थांच्या नकाशात शेतचा-यांच्या संरेखा कार्यक्षेत्र निश्चितीच्या वेळीच दाखवाव्यात. शॆतचा-यांची दुरूस्ती मुख्य चा-यांच्या पुनर्स्थापने बरोबर शासनाने करुन द्यावी. त्यानं शेतचा-यांवरून होणारे वाद व पाणीनाश कमी होईल.प्रकल्पाच्या एकूण कार्यक्षमतेत वाढ होईल.
) पाणी वापर हक्क घनमापन पद्धतीनं देण्याकरिता पाण्याचं सूयोग्य नियमन व ते विश्वासार्ह पध्दतीनं मोजणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याकरिता विमोचके (आउटलेटस) व प्रवाह मापकांची प्रत्यक्ष जागेवर दर्जेदार उभारणी, देखभाल-दुरूस्ती, मूल्यमापन व अंशमापन (कॅलिब्रेशन) करण्यासाठी शासनानं स्वतंत्र व्यवस्था करावी. ही कामं संख्येनं प्रचंड व ग्रामीण भागात विखुरलेली असल्यामूळं ती करण्याकरिता स्थानिक लघु उद्योजक व एजन्सीजना प्रशिक्षण व प्रोत्साहन द्यावं. प्रवाह मापकांचे अत्याधुनिक प्रकार (उदा. इलेक्ट्रॉनिक) वापरावेत.
) लाभक्षेत्रातील जमीनी एन. . होण्याचं भयावह प्रमाण लक्षात घेता जल संपदा विभाग व पा.वा. संस्थांचा ना हरकत दाखला असल्याशिवाय जमीनी अ-कृषी करू नयेत.
लघु वितरिकास्तरावरील पा.वा.संस्था वगळता अन्य स्तरावरील पा.वा. संस्थांसंदर्भात कायदा व नियमात योग्य त्या फेरफारासह अशी शब्दरचना ठिकठिकाणी आढळते. त्याबाबत सुस्पष्ट तपशील शासनाने उपलब्ध करावा म्हणजे अंमलबजावणीत सुसुत्रता व एकवाक्यता येईल.
) पा. वा. संस्थांच्या पदाधिका-यांना नक्की कोणते अधिकार नवीन कायद्यानं दिले आहेत ते शासनानं जाहीर करावं.
१०) कायदा व नियमांची पुस्तके तसेच विविध विहित नमुने व नोंदवह्या वगैरे गोष्टी शासकीय मुद्रणालया तर्फे सर्वत्र सहज उपलब्ध असाव्यात.

(हा लेख साप्ताहिक "आधुनिक किसान"औरंगाबाद[मार्च २०१२]मध्ये प्रसिद्ध झाला आहे.)
          



         
         




(5) महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ [मसिंपशेव्य अधिनियम,२००५]


लाभक्षेत्रे - कुरूक्षेत्रे
"विधि"लिखित - "जल-वास्तव" -  "जल-स्वप्न"
-- प्रदीप पुरंदरे
भाग १. - "विधि"लिखित
   महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ [मसिंपशेव्य अधिनियम,२००५]
पार्श्वभूमि:
       फड पद्धतीचा अभिमानास्पद वारसा असलेल्या महाराष्ट्र देशी सिंचन व्यवस्थापनात लोकसहभागाची अधिकृत तरतुद करणारा कायदा अवतरला तो मात्र जागतिक बॅंकेने महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पाकरिता  [..सु.प्र.]  रू. १८०० कोटींचे कर्ज देताना अट घातली म्हणून. खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाच्या [खाउजा] प्रक्रियेचं जलक्षेत्रातलं प्रतिबिंब म्हणजे मसिंपशेव्य अधिनियम,२००५! खाउजा ची मुख्य कार्यक्रम पत्रिका राबवताना "मार्गे लोकसहभागाचा थांबा" असा जरी एकूण प्रकार असला तरी हा कायदा काही नव्या शक्यता निर्माण करतो. जल व्यवहाराचे लोकशाहीकरण, जलक्षेत्रात नवीन भांडवल व आधुनिक तंत्र आणि पाणी वापर संस्थांचं सक्षमीकरण याची एक सुरूवात कदाचित या कायद्यामूळे होऊ शकते. अर्थात, कायद्याची पूर्ण अंमलबजावणी झाली तर.
नावात काय आहे?
   आजवर सहभागात्मक सिंचन व्यवस्थापन असं म्हटलं जायचं. ती संकल्पना मर्यादित होती. सिंचन व्यवस्थापन मूळ आमचंच [शासनाचं] पण त्यात तुमचा [लोक] सहभाग असा प्रकार होता. आता विचार बदलला. मोठा झाला. पाणी शेतक-यांचं. सिंचन व्यवस्थापनही त्यांचंच. त्याला पाठबळ देण्याकरिता कायदा. म्हणून कायद्याचं नाव जाणीवपूर्वक ठेवलं आहे - महाराष्ट्र सिंचन पद्धतींचे "शेतक-यांकडून" व्यवस्थापन अधिनियम, २००५. नावात काय आहे? असं म्हटलं जाऊ शकतं. पण कायद्याची प्रक्रिया व तपशीलही नावास साजेसा असल्यामूळे आशा वाढते.
                                                                                           _____________________________________________________
नवा कायदा नव्या आशा
* जल व्यवहाराचे लोकशाहीकरण
* जलक्षेत्रात नवीन भांडवल व आधुनिक तंत्र
* पाणी वापर संस्थांचं सक्षमीकरण
* पूर्ण प्रकल्पाचं जल व्यवस्थापन - पाणी वापर संस्थांकडं
_____________________________________________________

कायद्याची प्रक्रिया:
    कायद्याचा मसुदा तयार करण्याकरिता राज्यस्तरावर समिती नेमली गेली. वाल्मीच्या प्राध्यापकांनी त्यात महत्वाची भूमिका बजावली. समितीचं काम चांगलं झालं.विधेयकाचा मसुदा सर्वांकरिता खुला होता. त्यावर जाहीर चर्चा झाल्या. शासनास पचतील तेवढे बदल स्वीकारलेही गेले. मंत्री मंडळाच्या उप समितीनं मसुदा अभ्यासला. विधान मंडळाच्या संयुक्त समितीपुढेही त्याची छाननी झाली. सतरा आमदारांच्या त्या समितीत गणपतराव देशमुख आणि बी. टी.देशमुख असे दोन अभ्यासू व आदरणीय आमदारही होते. चार महिन्यात ११ बैठका घेऊन संयुक्त समितीनं मसुदा निश्चित केला व विधान मंडळानं अंतिमत: त्याला मान्यता दिली. लोक सहभागाच्या या महत्वपूर्ण कायद्यास प्रसिद्धी मात्र मिळाली नाही. कारण विधेयक फाडणे किंवा विधानसभेत राडा करणे असा लोक सहभाग मात्र हा कायदा करताना लाभला नाही.
     मपाअ७६ ची झालेली परवड व त्यातून घेतलेला धडा, वाल्मीच्या प्राध्यापकांनी धरलेला आग्रह व केलेली मेहनत आणि जागतिक बॅंकेचा दटट्या यामूळे या कायद्याचे नियम लगेचच झाले. आवश्यक त्या अधिसूचनाही [काही अपवाद वगळता] वेळेवर निघाल्या. वाल्मीनं प्रशिक्षण दिलं. एकूण सुरुवात चांगली झाली.
उद्दिष्टं: 
        केवळ लघु वितरिका स्तरावर पाणी वापर संस्था [पा.वा.संस्था] स्थापन करणे हे या कायद्याचं उद्दिष्ट नाही. वितरिका, कालवा व प्रकल्पस्तरांवरदेखील पा.वा. संस्था स्थापन करणे आणि शेवटी संपूर्ण प्रकल्पाचं जल व्यवस्थापन  प्रकल्पस्तरिय संस्थेकडे हस्तांतरित करणं या कायद्याला अभिप्रेत आहे. पाणी वापर हक्क, घनमापन पद्धतीनं पाणी पुरवठा, पिक स्वातंत्र्य, कालवा व विहिर यांच्या पाण्याचा संयुक्त वापर या व तत्सम अभियांत्रिकी बाबींबरोबरच काही महत्वाच्या सामाजिक व आर्थिक उद्दिष्टांचाही समावेश या कायद्यात आहे.
व्याप्ती:
       निधीच्या मर्यादांमूळे सध्या हा कायदा फक्त म..सु.प्र.अंतर्गत निवडलेल्या २८६ प्रकल्पांना [कारण जागतिक बॅंकेने या प्रकल्पातील चा-यांच्या पुनर्स्थापने करिता कर्ज दिले आहे] आणि सर्व बांधकामाधीन प्रकल्पांना [कारण तेथे चा-यांच्या पुनर्स्थापनेचा प्रश्न नाही. त्या प्रकल्पीय खर्चाने बांधल्या जात आहेत] लागू आहे. तो इतर सिंचन विषयक कायद्यांच्या जोडीने अंमलात आणायचा आहे. या कायद्यातील महत्वाच्या तरतुदींचा तपशील या लेखात पुढे दिला आहे.



___________________________________________________
पाणी वापर संस्था: रूप व आशय दोन्ही बदलले
* नोंदणी जल संपदा विभागाकडे
* शासकीय राजपत्रात अधिसूचना
* अध्यक्षपदाकरिता रोटेशन -टेलवाल्यांना प्राधान्य
* महिलांकरिता आरक्षण
* पाणी वापर हक्क मिळणार       
_____________________________________________

महत्वाच्या तरतुदी:
) या कायद्याअंतर्गत येणा-या प्रकल्पातील पाणी वापर संस्थांची नोंदणी आता सहकार विभागाऎवजी जल संपदा विभागाकडे होईल. त्यामूळे पाणी देणारं खातं एक आणि नोंदणी दुस-याच खात्याकडं असं होणार नाही. नोंदणीची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. वैयक्तिक लाभधारक शेतक-याकडून आता सभासदत्वाकरिता अर्ज, फी, भागभांडवल याची जरूरी नाही. पा.वा.संस्थेचे कार्यक्षेत्र शासकीय राजपत्रात अधिसूचनेद्वारे एकदा शासनानं निश्चित केलं की त्या क्षेत्रातील सर्व १००% लाभधारक शेतकरी संस्थेचे सभासद मानले जातील. सभासद, बिगर सभासद असा भेद त्यामूळे होणार नाही. सहकार विभागाकडे नोंदणी करताना किमान ५१% शेतकरी किंवा ५१% जमिनीचे मालक  सभासद असले तरी चालतं. त्यामूळे काही ठिकाणी राजकारण होतं. काही शेतक-यांची अडवणूक होते. त्यांना सभासदच करून घेतलं जात नाही. पाणी दिलं जात नाही किंवा दिलं तर पाणीपट्टी जास्त आकारली जाते.नवीन कायद्यानं आता हे प्रकार बंद होतील.
) सिंचनासाठीचा पाणी पुरवठा फक्त पा. वा. संस्थांमार्फतच होईल. जल संपदा विभागाकडं सभासदाला वैयक्तिक पाणीअर्ज [उदा. फॉर्म क्र.] करावा लागणार नाही.
) पा. वा. संस्थांना कायद्यानं पाणी वापर हक्क मिळतील. सभासदांची विहित नमुन्यातील प्रमाणित यादी व संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विहित तपशील दर्शवणारा प्रमाणित नकाशा याआधारे प्रत्येक संस्थेची अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रकाशित केली जाईल. त्यामूळे पाणी वापर हक्कांची जपणूक होईल. शेतीचं पाणी पळवण्याचा प्रयत्न झाला तर अधिसूचने आधारे रितसर आक्षेप घेता येईलकिमान न्यायालयात तरी जाता येईल.
) संस्थेच्या व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ ६ वर्षांचा राहिल. पैकी पहिली दोन वर्षं कालव्याच्या शेपटाकडील संचालक अध्यक्ष असेल. पुढील दोन वर्षं मध्यभागातील तर शेवटची दोन वर्षं कालव्याच्या मुखाकडील अशी चक्रिय पद्धत अध्यक्षपदासाठी असेल. ज्या टेलच्या भागाला पाणी मिळण्यात नेहमी अडचण असते त्या भागाला प्राधान्य मिळावे हा एक हेतू. कोणा एकाची मक्तेदारी होऊ नये आणि इतरांना अनुभव मिळून सामुदायिक नेतृत्व विकसित व्हावे व संस्थेचं स्वरूप एक खांबी तंबू असं होऊ नये हे ही त्यात अभिप्रेत आहे.
) पहिल्या दोन टर्मस् मध्ये महिला अध्यक्ष म्हणून निवडून आली नाही तर शेवटची टर्म महिला अध्यक्षाकरिता आता आरक्षित राहिल. शेतीमध्ये महिला राबराबतात पण निर्णय प्रक्रियेत त्यांना स्थान नसतं. ते स्थान त्यांना आता मिळू शकते. घरातील महिलेमूळे आपल्या घरात पाणी वाटपाची सत्ता येऊ शकते हे लक्षात आल्यावर तरी महिलांच्या नावावर शेतीचा गुंठा केला जाईल हा आशावादही या तरतुदी मागे आहे.
) पा. वा. संस्थेच्या पदाधिका-यांना आता कालवा अधिका-यांच्या समकक्ष अधिकार देण्यात आले आहेत. ते त्यांनी अभ्यास करुन जबाबदारीने वापरले तर गुणात्मक फरक पडू शकतो.
) लघु वितरिका, वितरिका, कालवा व प्रकल्प अशा ४ स्तरांवर पा. वा. संस्था स्थापन करून त्यांच्याकडे तंटा निवारणाचं काम दिल्यानं एका अर्थानं कायदा प्रत्येक प्रकल्पात एक छोटी जल संसद निर्माण करतो. आता या जल संसदेत जबाबदार मंडळी निवडुन गेली आणि तात्कालिक राजकारण टाळून त्यांनी समन्यायी पाणी वाटप केलं तर मोठे बदल होऊ शकतातनव्या दमाचे जल व्यवस्थापक व जलकर्मी जल संसदेचं सामुदायिक नेतृत्व करुन पाणी चोरणा-या पुढा-यांना वठणीवर आणू शकतात. कालवा सल्लागार समित्यांची अरेरावी संपवू शकतात. वाट्टेल तेव्हा पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षणाचा फतवा काढणा-या जिल्हाधिका-यांवर शेतक-यांच्या वतीनं दबाव आणू शकतात. प्रारंभिक सिंचन कार्यक्रम (पी. आय. पी.) तयार करण्याचा अधिकार नवीन कायदा प्रकल्पस्तरीय संस्थेस देतो हे येथे विशेष करून लक्षात घेतले पाहिजे. फार मोठा बदल आहे हा. त्याचं महत्व जाणलं पाहिजे.
) पा. वा. संस्थांबरोबर करारनामा करणं, चा-यांची सद्यस्थिती जाणून घेण्याकरिता संयुक्त पाहणी करणं आणि चा-यांची पुनर्स्थापना करून हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करणं या सर्वाकरिता कायद्यानं आता विहित कार्यपद्धती व निश्चित कालमर्यादा घालून दिली आहे. या बाबतचा कंत्राट व्यवस्थापन समितीचा शासन निर्णयही सकारात्मक आहे. या दोहोंमूळे पा. वा. संस्थांच्या निर्मितीला एक गती प्राप्त होईल.
)व्यवस्थापन म्हणजे मोजणे ( मॅनेजमेंट इज मेझरमेंट) या तत्वानुसार पाणी मोजून समन्यायानं घनमापन पद्धतीनं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामूळे पाण्याचे हिशेब ठेवणं, जललेखा व बेंचमार्किंग करणं बंधनकारक होईल. जल व्यवहारात आधुनिकता, शिस्त, काटेकोरपणा व पारदर्शकता येण्याची शक्यता वाढेल.
१०)संस्थेला एकदा पाणी मोजून दिलं की त्या पाण्यात कोणती पिकं घ्यायची याचं स्वातंत्र्य संस्थेस असेल. समन्याय व आर्थिक फायदा याची व्यावहारिक सांगड घालून संस्था आता निर्णय घेऊ शकेल.
११) पाण्याच्या पुनर्वापरास कायदा आता केवळ मुभाच नव्हे तर प्रोत्साहन देतो .
१२) शासनाकडून सवलतीच्या दरानं मिळालेलं पाणी सदस्यांना कोणत्या दरानं द्यायचं हे ठरविण्याचे अधिकार संस्थेला राहतील. मूळ पाणीपट्टीवर सेवाशुल्कही आकारता य़ेईल. संस्था आर्थिकदृष्टया  सक्षम व्हाव्यात हा हेतू त्यामागे आहे.
१३) शेती मध्ये नवीन भांडवल व आधुनिक तंत्र यावं, शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळावा, अडते-दलाल-कमिशन एजंट या साखळीपासून शेतक-यांची मुक्तता व्हावी, इत्यादि हेतूने कंत्राटी शेतीची [कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग] तरतुदही कायद्यात आहे.
येथे फक्त महत्वाच्या / ठळक  तरतुदींची चर्चा केली. विस्तारभयामूळं सर्व तपशील अर्थातच मांडला नाही. आणि जो मांडला तो म्हणजे अर्थातच नाण्याची एक बाजू आहे. सैद्धांतिक-कागदावरची! नाण्याची दूसरी बाजू - कायद्याच्या अंमलबजावणीचा आजवरचा अनुभव - त्याबद्दल पुढील लेखात.
(हा लेख साप्ताहिक "आधुनिक किसान"औरंगाबाद[मार्च २०१२]मध्ये प्रसिद्ध झाला आहे.)      



        

         
         




(4) कालवा अधिका-यांच्या नियुक्त्या व त्यांचे अधिकार


लाभक्षेत्रे - कुरूक्षेत्रे
"विधि"लिखित - "जल-वास्तव" -  "जल-स्वप्न"
-- प्रदीप पुरंदरे
भाग १. - "विधि"लिखित
  महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ [मपाअ७६]

कालवा अधिका-यांच्या नियुक्त्या व त्यांचे अधिकार

.पा..७६ची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कालवा अधिका-यांची आहे. त्याकरता कायद्यात खालीलप्रमाणे सूस्पष्ट तरतूदी आहेत:
     )राज्यातील पाटबंधारे क्षेत्राची प्रदेश(रिजन),मंडळ(सर्कल),विभाग(डिव्हिजन),उपविभाग(सब डिव्हिजन),शाखा(सेक्शन)अशी विभागणी (व त्यात बदल) समूचित प्राधिकरणाने (म्हणजे    राज्य शासनाने) कलम क्र.५ अन्वये करणे.
     )जी विभागणी केली(वा त्यात बदल)त्या संदर्भात कालवा अधिका-यांची नेमणूक कलम क्र. ८ अन्वये अधिसूचित करणे.
     )मुख्य अभियंत्यांपासून शाखाधिका-यांपर्यंत( आणि खरे तर कालवा निरीक्षक व मोजणीदारही - पहा व्याख्या २()/शेवटची ओळ) सर्वांची कलम क्र.६ नुसार कालवा अधिकारी म्हणून नेमणूक करणे आणि कलम क्र.() अन्वये तसे आदेश काढणे.
     )कालवा अधिका-यांमध्ये कलम क्र.१० नुसार कामे वाटून देणे
     )कालवा अधिका-यांना कलम क्र. ११० अन्वये अधिकार व कर्तव्ये सोपवणे
     )मुख्य अभियंत्यांनी कलम क्र. ७ नुसार मुख्य नियंत्रक प्राधिकारी म्हणून त्यांच्या प्रदेशात सर्व अधिकार वापरणे.
     )कलम क्र. १०९ अन्वये न्यायिक प्रक्रिये अंतर्गत चौकशी करणे
  कलम क्र.() अन्वये कालवा अधिका-यांच्या नियुक्त्या व त्यांचे अधिकार याबाबत  तपशीलवार शासन निर्णय (क्र.१०.०४/(३०९/२००४)/ सिं.व्य.(धो) दि.३१//२००४) असुनही त्याची अंमलबजावणी होत नाही.वर नमूद केलेल्या कलम क्र. ,१०,११०,७ व १०९ नुसार अपेक्षित कारवाई होताना दिसत नाही.मंडळी कालवा अधिकारी म्हणून पुढाकार घेऊन कायदा राबवत नाहीत..पा..७६ अंतर्गत विशिष्ट कलमाखाली गुन्हे नोंदवणे,प्रकरण न्यायालयात जाणे आणि न्यायालयाने काही निर्णय देणे असे काहीच होत नाही. त्यामूळे कायद्याचा अभ्यास नाही. अनुभव नाही. आत्मविश्वास नाही. कालवा अधिका-यांना कायदेशीर सल्ला द्यायला कायम स्वरुपी अधिकृत व्यवस्था नाही.अंमलबजावणी करू पाहणा-यांना संरक्षण नाही. राजकीय दबाव व ह्स्तक्षेपाचा मात्र कायम महापूर आहे.पाणी चोरी आणि अन्य सिंचन गुन्हे सुखेनैव घडता आहेत. शिस्त नाही. कायद्याचा दरारा नाही. वचक नाही. जल व्यवस्थापनात मुळी   कायद्याचे राज्यच नाही.

________________________________________________________________________
 अधिकार दिले आहेत. जबाबदारी निश्चित करा.
कायद्याच्या अंमलबजावणीबाबत मुख्य अभियंत्यांना "मुख्य नियंत्रक प्राधिकारी" म्हणून जबाबदार धरा.
कालवा अधिका-यांच्या नियुक्त्या व त्यांचे अधिकार याबाबतच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा.
__________________________________________________________________________
पाणीचोरी आणि अन्य सिंचन गुन्हे रोखण्यासाठी कायद्यातील तरतुदी
  नियम असतील, विविध अधिसूचना काढल्या असतील,कायद्याची अंमलबजावणी करण्याची मानसिकता असेल आणि कालवा अधिका-यांना जलसंपदा विभाग (.सं.वि.) संरक्षण देणार असेल तर म.पा..७६ मध्ये पाणीचोरी आणि अन्य सिंचन गुन्हे रोखण्यासाठी असलेल्या खालील भरीव तरतुदींचा उपयोग शक्य आहे.( कंसातील आकडे म.पा..७६ मधील कलम क्र. दर्शवतात)
     )लाभक्षेत्रातील पाण्याच्या निच-यास होणारे अडथळे दूर करणे (१९,२०,२१). कालवा अधिका-यांचा निर्णय अंतिम मानला जाईल. त्या विरूद्ध दिवाणी न्यायालयातसुद्धा जाता येणार नाही (२१)
     )पाणी पुरवठा बंद करण्याचा अधिकार(४९)
     )पाणी चोरीबद्दल सामुदायिक दंड (५२)
     )पाणी नाशाबद्दल सामुदायिक दंड (५३)
     )दंडासह पाणीपट्टी वसूल करणे (५४)
     )कालवा नुकसानीच्या दुरुस्तीच्या खर्चाची सामुदायिक वसूली (१०८)
     )अपराध सिद्ध झाल्यास कारावास, दंड अथवा दोन्ही शिक्षा (९३,९४). या कलमांखालील शिक्षापात्र अपराध कलम ९८ अन्वये दखलपात्र व जामीनपात्र आहेत.
     )अपराध्यास वारंटाशिवाय अभिरक्षेत (कस्टडीत) घेता येणे (९६)
     )ज्या साधनाने पाणी चोरी होत असेल ते साधन जप्त करणे व वीज पुरवठा खंडित करण्याचा आदेश  कालवा अधिका-याने देणे व तो आदेश वीज पुरवठा करणा-यांवर बंधनकारक असणे(९७)
      .पा..७६ च्या रूपाने ज.सं.वि. कडे चांगले हत्यार गेली ३६ वर्षे उपलब्ध आहे.पण ते न वापरल्यामूळे गंजले आहे. बोथट झाले आहे. प्रथम पासून वापरले असते तर जल व्यवस्थापनाची घडी व्यवस्थित बसली असती. शिस्त आली असती.पाणीचोरी आणि अन्य सिंचन गुन्हे थोडेफार तरी कमी झाले असते.वेळ अजूनही गेलेली नाही. कायद्याने सगळे होईल असे नाही पण कायद्याची अंमलबजावणीच न करता समन्याय कसा प्रस्थापित होईल?   
       सिंचन कायदेविषयक सर्व बाबींचा सखोल आढावा घेणे, कायदेविषयक प्रक्रियेला चालना देणे, त्या प्रक्रियेचे संनियंत्रण व मूल्यमापन करणे आणि कालवा अधिका-यांना अधिकृत मार्गदर्शन करणे या करता एक कायम स्वरूपी स्वतंत्र उच्चाधिकार प्राप्त यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, मंत्रालयात "जल कायदे व सूशासन कक्ष" स्थापन करता येईल. त्याला पूरेशा सुविधा, उचित अधिकार व सूस्पष्ट जबाबदा-या दिल्यास कदाचित फरक पडेल. कायदे विषयक तपशीलाकडे दूर्लक्ष करणे योग्य नाही. सैतान तपशीलात असतो![डेव्हिल इज इन डिटेलस.]
                                                                       ____________________________________________________________________
कायद्याच्या अंमलबजावणीचा लेखाजोखा?
* .पा..७६ अंतर्गत कोणत्या विशिष्ट कलमांन्वये आजवर किती गुन्हे दाखल झाले?
    * न्यायालयांनी निर्णय काय दिले? किती जणांना नक्की कोणत्या व किती शिक्षा झाल्या?
* ग्राहकमंचांपुढे किती प्रकरणे गेली? काय निर्णय दिले ग्राहकमंचांनी?
* जिल्हाधिका-यांनी किती प्रकरणी नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले?
____________________________________________________________________

उपसा सिंचन व कायदा:
      सिंचन प्रकल्पांचे नियोजन करताना पूर्वी फक्त प्रवाही सिंचनच गृहित धरलं जायचं.तेंव्हा अजून ठिकठिकाणी मोठया प्रमाणावर जलसाठे नव्ह्ते. लोकांना पाण्याची खरी किंमत अजून कळायची होती. वीज सर्वत्र पोहोचली नव्हती. पाणी उपशाची बकासुरी यंत्रं अद्याप आली नव्हती. सहकार क्षेत्राचा नुकताच उदय झाला होता. म्हणावी तशी लोकजागृती नव्हती. उपसा योजनांसाठी सुलभ कर्जं मिळत नव्हती. पाणी अजून तुलनेनं स्वच्छ होतं. पाण्याचं राजकारण अजून रंगायचं होतं. "माळ्याच्या मळ्यामध्ये फक्त गुलाब, जाई,जुई, मोगराच" फुलत होते! आणि बघता बघता सगळंच बदललं! उपसा सिंचन कानामागून येऊन तिखट झालं. धाकटया पातीनं घरच ताब्यात घेतलं. पाणी गढूळ झालं. राजकारणानं उचल खाल्ली. अगोदरच दुबळी असलेली समन्यायाची कल्पना पाण्याच्या बेसुमार उपश्यानं पार खलास झाली. जलाशय, कालवा आणि नदीवरुन उपसा सिंचन वाढीस लागणं हे एका अर्थी स्वाभाविक होतं. अपरिहार्य होतं. माझ्या शेताजवळ पाणी आहे पण जमीन उंचावर असल्यामुळे मी पाण्यापासून वंचित राहतो हा अन्याय होता. तेंव्हा काळाच्या ओघात एक वेळ अशी होती की, उपसा सिंचनाला रितसर मंजूरी देणे हाच मुळी समन्याय होता. काही अंशी आजही आहे! पण उपसा सिंचनाला परवानग्या देताना जलसंपदा विभागाने पथ्यं पाळली नाहीत म्हणा किंवा राजकीय दडपणाखाली अतिरेक झाला म्हणा आता अनेक ठिकाणी पाण्याचा बेसुमार उपसा होतो आहे. प्रवाही विरूद्ध उपसा सिंचन हा संघर्ष तीव्र झाला आहे. प्रवाही सिंचनाचं तर्कशास्त्र व व्यवस्थापन प्रत्येक प्रकल्पात उध्वस्त होत आहे.हे सगळं का झालं? .पा..७६ मध्ये उपसा सिंचनाबद्दल फारशा तरतुदी नसणं आणि ज्या आहेत त्यांची (कलम क्र. ,,११,११६) अंमलबजावणी न होणं हे एक (एकमेव नव्हे!) महत्वाचं कारण आहे. .पा..७६ मध्ये सुधारणा करून उपसा सिंचनाबद्दल सूस्पष्ट व पुरेशा तरतुदी करणं आणि त्या अंमलात आणणं हा एक (एकमेव नव्हे!) उपाय होऊ शकतो. पाणी वापर संस्थांसाठीच्या २००५ सालच्या कायद्यातील कलमं ३९ ते ५१ या आधारे आता उपशाचं जास्त चांगलं नियमन शक्य आहे. ..नि.प्रा. कायद्यातील कलमं ११ ते १४ व २२ ही याबाबत उपयोगी पडू शकतात. उपसा सिंचनासाठी मंजूरी देण्याबाबतचा २१/११/२००२ च्या शासन निर्णयाची मदत होऊ शकते.उपसा सिंचनाकरता नवीन कायद्या आधारे पाणी वापर संस्था स्थापन करणं; त्या संस्थांना प्रकल्पस्तरीय संस्थेचा अविभाज्य भाग मानणं; इतर पाणी वापरकर्त्यांनी - विशेषत: प्रवाही सिंचनाच्या पाणी वापर संस्थांनी उपसावाल्यांवर सामाजिक दबाव आणणं; उपसाचं क्षेत्र अधिसूचित होणं आणि उपसाचं पाणी मोजलं जाणं हे खरं तर जास्त प्रभावी उपाय आहेत. पण हे झाले सैद्धांतिक उपाय व शक्यता! व्यवहार जर उलटा असेल आणि उपसा सिंचनाचं नियमन व नियंत्रण करण्याची मानसिकता व इच्छाच नसेल तर पाणी वाटपात समन्याय आणि पाणी वापर हक्क असलं काहीही होणे नाही. प्रवाही सिंचनाच्या झालेल्या संस्थाही त्यामुळे अयशस्वी ठरतील. नवीन कायद्यांमूळे वाढलेल्या अपेक्षांचा फुगा फुटेल व भ्रमनिरास होईल. पाणी प्रश्नाच्या या सापशिडीच्या जीवघेण्या खेळात कायद्याची गळती व समन्यायाची  उचलबांगडी मात्र होईल!
                                                                                                               _____________________________
उपसा सिंचनाला कायद्याच्या कक्षेत आणा
* उपसा सिंचना संबंधित अधिसूचना काढा व करारनामे करा.
* उपसा सिंचनाचे क्षेत्र निश्चित करण्याकरिता मार्गदर्शक तत्वे जाहीर करा.
* ..नि.प्रा. अधिनियमातील कलम क्र.१२() () (.) अंमलात आणा.
* उपसा सिंचनाचे पाणी वापर हक्क निश्चित करा. उपसावाल्यांनाही पाणी मोजून द्या.
____________________________
     
(हा लेख साप्ताहिक "आधुनिक किसान"औरंगाबाद[फेब्रुवारी २०१२]मध्ये प्रसिद्ध झाला आहे.)