Sunday, August 4, 2013

पाणी परिषद, औरंगाबाद (४ ऑगस्ट २०१३)

पाणी परिषद, औरंगाबाद
(४ ऑगस्ट २०१३)

गोदावरी खो-यातील सर्व सुज्ञ नागरिकांनी खालील मुद्यांचा विचार करावा ही नम्र व आग्रहाची विनंती

१.०  महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ अन्वये खालील बाबींची पूर्तता झाली आहे का?

(१) कलम ११: नदीनाल्यांची अधिसूचना
(२) कलम ३: सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रांच्या अधिसूचना
(३) कलम ७: मुख्य नियंत्रक प्राधिका-यांच्या नियुक्त्या
(४) कलम ८: कालवा अधिका-यांच्या नियुक्त्या व त्यांच्या कार्यक्षेत्रांच्या अधिसूचना
(५) कलम ३ व ११६: उपसा सिंचन योजनांच्या अधिसूचना
(६) कलम ११०: कालवा अधिका-यांना अधिकार प्रदान करणे
(७) कलम ११४: नियम करणे

२.० महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम,२००५ अन्वये खालील बाबींची पूर्तता झाली आहे का?

(१) कलम२(१) (प): गो.म.पा.वि.महामंडळाने नदीखोरे अभिकरण म्हणून काम करणे
(२) कलम १४: नदी खोरे अभिकरणाने पाणी हक्क देणे
(३) कलम १५: राज्य जल मंडळाने एकात्मिक राज्य जल आराखडा तयार करणे
(४) कलम १६: राज्य जल परिषदेने एकात्मिक राज्य जल आराखडा मंजूर करणे
(५) कलम ११ (च): मंजूर एकात्मिक राज्य जल आराखडयाच्या मर्यादेत म.ज.नि.प्रा.ने काम करणे
(६) कलम१२(७) ते (१०) (क): टेल टू हेड पाणी वाटप, भूजल वापर विनियमन, भौतिक अनुशेष दुर करणे आणि अवर्षणप्रवण भागास पाणी उपलब्ध करण्यासाठी म.ज.नि.प्रा.ने प्रयत्नशील राहणे
(७) कलम २१ अनुशेषग्रस्त भागासाठी म.ज.नि.प्रा.ने विशेष जबाबदारी पार पाडणे
(८) कलम१३ व २२: विवाद सोडवणारा अधिकारी नेमणे, विवाद व अपील प्रकियेची व्यवस्था कार्यरत करणे
(९) कलम २३: शासनाने म.ज.नि.प्रा.स आदेश देणे
(१०) कलम ११(च) व २१: राज्यपालांनी म.ज.नि.प्रा.स आदेश देणे

३.०  पाणी वापर संस्था स्थापन झाल्या आहेत का? त्या कार्यरत आहेत का? जलसंकट गंभीर असताना त्या गप्प का?

४.० कालवा सल्लागार समित्या प्रकल्पवार नेमल्या आहेत का? त्या कार्यरत आहेत का? जलसंकट गंभीर असताना त्या गप्प का?

५.० राज्य जल मंडळाचे पदसिद्ध सदस्य म्हणून विभागीय आयुक्तांनी आजवर पार पाडलेल्या जबाबदारीचा तपशील काय आहे?

६.० राज्य जल परिषदेचे पदसिद्ध सदस्य म्हणून "मंत्री (मराठवाडा प्रदेशाचा प्रतिनिधी)" कोण आहेत? त्यांनी आजवर पार पाडलेल्या जबाबदारीचा तपशील काय आहे?

७.० गो.म.पा.वि.महामंडळाच्या कार्यक्षेत्रातून सध्या म.ज.नि.प्रा. वर विशेष निमंत्रित म्हणून कोण आहेत? ते काय करता आहे?

८.० म.ज.नि.प्रा. वर सदस्यम्हणून गो.म.पा.वि.महामंडळाच्या कार्यक्षेत्रातून कोण होते? कोण आहेत? त्यांनी आजवर काय केले? ते काय करता आहेत?

९.० एकात्मिक राज्य जल आराखडा कोण तयार करत आहे? त्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी व खाजगी कंपन्या नेमल्या आहेत का? त्यासाठी आजवर किती शासकीय पैसा खर्च झाला? फलित काय? काम केव्हा पूर्ण होणे अपेक्षित होते?

१०.० वरील प्रश्नांची उत्तरे समाधानकारक नसतील आणि जल प्रशासनाची चौकटच नसेल किंवा ती कार्यरत नसेल तर जटील पाणी-प्रश्न सुटणार तरी कसा?

- प्रदीप पुरंदरे
९८२२५६५२३२




No comments:

Post a Comment