Monday, October 20, 2014

ते भाकित खरे ?

औरंगाबाद
दि. २०.१०.२०१४

प्रिय संपादक,
दै. दिव्य मराठी

महोदय,

राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्यासंदर्भात "चौकशी समितीचे राजकीय नाटक" या माझ्या  लेखाकडे (दिव्य मराठी, १९ नोव्हेंबर २०१३) मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो. सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चितळे समितीबद्दल  त्या लेखात मांडणी केल्यावर मी शेवटी पुढील विधान केले होते -  " एक शक्यता अशी वाटते की, राजकीय तडजोडी घडवून आणण्यासाठी सिंचन घोटाळ्याचा एक हत्यार म्हणून वापर होईल". माझे ते भाकित खरे ठरावे अशी राजकीय परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.  राष्ट्रवादीने आपणहून दिलेला पाठिंबा नाकारणे हे राजकीय शिष्टाचाराला धरून होणार नाही असे म्हणणे शेवटी काय दर्शवते? जनादेशाचा आदर करून "आता तरी शहाणपणा दाखवा" (विशेष संपादकीय, २० ऑक्टोबर २०१४) हा योग्य व समयोचित सल्ला म्हणून वाया जाण्याचीच शक्यता जास्त वाटते. यश आणि शहाणपणा फार काळ एकत्र राहत नाहीत!

-प्रदीप पुरंदरे
सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी.


[Letter published Divya Marathi , 21.10.2014]

No comments:

Post a Comment