Saturday, January 26, 2019

जलनायक, जलयोद्धे....


जलयुक्त शिवार अभियानातील जलसाक्षरतेची जबाबदारी शासनाने जलनायक, जलयोद्धा,जलकर्मी,जलप्रेमी, जलदूत, जलसेवक आणि जलकर्मी इत्यादींवर टाकली आहे. दि. ३० नोव्हें २०१६ च्या शासन निर्णयानुसार शासनाला खालील व्यवस्था अपेक्षित आहे असे दिसते.

तपशील
जलकर्मी व जलसेवक
जलनायक, जलयोद्धा, जलप्रेमी, जलदूत
कोण आहेत?
शासकीय अधिकारी /कर्मचारी
अशासकीय व्यक्ती
प्रशासकीय जबाबदारी
शासकीय अधिकारी /कर्मचारी म्ह्णून योजना अंमलात आणण्याची संपूर्ण   प्रशासकीय जबाबदारी
काही नाही
निवडीचे निकष
१. ‘स्वयंप्रेरणेने’ जलसाक्षरतेचे काम करण्यास इच्छुक
२. कामाचा अनुभव गृहित आहे
३. चांगले चारित्र्य
१. जलनायक व जलयोद्धा यांना
·      आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरावरील कामकाजाचा अनुभव असावा
·      प्राचीन जलसंस्कृतीपासून आधुनिक जलसंस्कृतीची जाण असावी.
२.. चांगले चारित्र्य
शासन दरबारी स्थान
गृहित धरले आहे
मानाचे
मोबदला / प्रत्यक्ष खर्चाची प्रतिपूर्ती
वेतन व इतर भत्ते
काही नाही
कामाचे मूल्यमापन
विशिष्ट उल्लेख नाही. पण शासकीय नियमानुसार व्हावे असे गृहित
विशिष्ट उल्लेख नाही
१.उपरोक्त शासन निर्णय जलयुक्त राबवणा-या मृद व जलसंधारण विभागाचा नाही; जलसंपदा विभागाचा आहे.
२.जलयुक्त शिवार अभियानात जलसंपदा विभागाने सक्रिय सह्भाग घेण्याबाबत दि. ३१जानेवारी २०१५ रोजी एक शासन निर्णय झाला होता!

वरील व्यवस्थेबाबत जलनायक, जलयोद्धा, जलप्रेमी, जलदूत, वगैरेंचा स्वत:चा अनुभव काय आहे? त्यांच्याबद्दल इतरांचा अनुभव काय आहे?




1 comment:

  1. जलसाक्षरता केंद्र स्थापन झाले तेव्हापासून,म्हणजे जवळपास आज चौथं वर्ष, हि संकल्पना सपशेल फेल झाल्याचे दिसून येते. पहिल्या वर्षीचा नवा उत्साह सोडता आता बरेच जिल्ह्यात जलनायक,जलयोद्धा म्हणून कुणी पुढे येत नाही, सरकारी अधिकारी - कर्मचाऱ्यांनाही जलकर्मी म्हणून काम करण्यात रस नाही. हे घडण्यासाठी मुख्य कारण म्हणजे जलसाक्षरता अभियानाकरिता ज्यांना जबाबदारी दिलेली मंडळी आहेत ती सारी संबंधित विषयातील तज्ञ नाही. गर्दी जमविण्यासाठी जलक्षेत्रातील राजेंद्रसिंह सारख्या, पोपटराव पवारांसारख्या किंवा अण्णा हजारेंसारख्यांचा कार्यक्रमांत वापर होतो. जलनायक जलयोद्धा म्हणून निवड झाली कि अशा कार्यक्रमांत गर्दी जमविण्याची जबाबदारी यापलिकडे काहीच साध्य नाही. हि सर्व मंडळी जलसंधारणातील तांत्रिकतेविषयी कितपत गंभीर हि चिंतेचीच बाब.

    ReplyDelete