Saturday, November 2, 2013

तेरा जहां आबाद रहे

पर्यावरणाचा बट्ट्याबोळ केला
विस्थापितांना देशोधडीला लावले
सिंचन प्रकल्पातल्या बागाईतदारांना कोरडवाहू केले
पाणी वापर संस्थांना पाणी नाही, पुरस्कार दिले
पाणी पुरवठ्याच्या योजना बंद पाडल्या
बाटलीबंद पाण्याला प्रोत्साहन दिले
जल नियमनाच्या नावाने वृद्धाश्रम चालवला
जलनीती व कायद्यांचे तर पार
फु बाई फु केले
...
....

सिंचन घोटाळाकरांचे पराक्रम काय सांगावेत?
आणि एवढे सगळे करून परत आता
जलवंचितांच्या हातावर ठेवणार
चितळ्यांची बाकरवडी!
....
......
तरीही
पाणी-आहेरेवाल्यांना
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!
...
......
तेरा जहां आबाद रहे

--जागल्या, पाणी-नाहीरेंकरिता
२ नोव्हें.२०१३

No comments:

Post a Comment