Friday, January 18, 2013

"पाण्याचा सरकारी खाक्या"


औरंगाबाद
७ जानेवारी २०१३
प्रिय संपादक,
दै. लोकसत्ता, मुंबई,

"पाण्याचा सरकारी खाक्या" या अग्रलेखात (७ जानेवारी २०१३) कालव्यांऎवजी बंद नळाने पाणी वाटप करण्याच्या योजनेचा उल्लेख वाचून म. ज्योतिबा फुले आठवले. "दर एक शेतक-याच्या शेताच्या मानाप्रमाणे प्रत्येकास एकेक तोटी करून द्यावी...." हे ज्योतिबांनी शेतक-याचा आसूड मध्ये सांगितले होते. आज काही प्रकल्पांत बंद नळाने पाणी देण्याचा प्रयोग होतो आहे. पण तो खूप मर्यादित आहे. आणि हेतूंबद्दल शंका यावी असा प्रकार काही ठिकाणी आहे. उदाहरणार्थ, उर्ध्व मानार मध्यम प्रकल्पावरील अहमद्पूर उपसा सिंचन योजना. कालवा व वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण झाली. पण ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली. ते लपविण्यासाठी तेथे बंद नळाने पाणी पुरवठा प्रस्तावित केला गेला. आता कालव्यातून पाईपलाईन नेणार आणि कालवे बुजवणार! क्या आयडिया सरजी? अनुशेषग्रस्त मागास भागातील अशा खर्चातून दुष्काळ निर्मूलन होणार हा पाण्याचा सरकारी खाक्या! असो!!

-प्रदीप पुरंदरे
९८२२५६५२३२
 [Letter published in Loksatta, 8.1.2013]

No comments:

Post a Comment