Thursday, March 28, 2013

"सिंचन सहयोग" या चितळेंशी संबंधित संस्थेस फार मोठा राजाश्रय


औरंगाबाद
दि.२६.३.२०१३
प्रति,
मा. संपादक,
दै.लोकसत्ता,
मुंबई,

महोदय,

"माधव चितळे यांची भूमिका पलायनवादी" (दै.लोकसत्ता, २६.३. २०१३) या श्री. विजय पांढरे यांच्या आरोपानिमित्ताने काही अन्य मुद्देही विचारात घेणे उचित होईल. "सिंचन सहयोग" या चितळेंशी संबंधित संस्थेस फार मोठा राजाश्रय प्रथमपासून लाभला आहे. शासकीय अधिका-यांना सिंचन सहयोगच्या कार्यक्रमात सहभागी होता यावे म्हणून विशेष शासन निर्णय काढण्यात आला आहे. संस्थेचे कार्यालय औरंगाबाद येथे शासकीय जागेत आहे. संस्थेचा पत्र व्यवहार गोदावरी खोरेच्या ई-मेल खात्याद्वारे होतो. अनेक शासकीय अधिकारी संस्थेचे पदाधिकारी व क्रियाशील सदस्य आहेत. सिंचन सहयोगच्या कार्यक्रमात त्यांच्या कार्यालयीन सुविधा व वाहने वापरली जातात का? विविध सिंचन घोटाळ्यातील अधिकारी सिंचन सहयोगचे सदस्य व पदाधिकारी आहेत / होते का? तसेच सिंचन सहयोग संस्थेस शासकीय अनुदान मिळते का? हे सर्व तपासले जाणे आवश्यक आहे असे वाटते.


-प्रदीप पुरंदरे
सेवानिवृत्त प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद
९८२२५६५२३२

Letter published in Loksatta, Mumbai on 28 Mar 2013

No comments:

Post a Comment