Saturday, July 23, 2016

नद्या खोलीकरणातील "गौण" बाब


ऍड. श्रीराम कुलकर्णी-नांदगावकर यांची कॉपीराईट पोस्ट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मागील दोन -तीन वर्षांमध्ये नदी खोलीकरण इतकी गौण बाब झालेली आहे की, कोणीही कसल्याही परवानग्या घेता जेसीबी मशीन घेऊन नदीपात्रात घुसावे आणि वाटेल तितके आणि वाटेल तसे उकरत फिरावे.
👉🏻लातूर जवळील पेठ जवळच्या तावरजा नदी खोलीकरणाचा दावा करणाऱ्या सनफ्लॉवर फौंडेशन चे पोस्टर "छावा" या संघटनेकडून जाळण्यात आले आणि खोलीकरणा दरम्यान प्राप्त झालेले गौण खनिज कोठे आहे ? हा गंभीर प्रश्न संघटनेने उपस्थित केला.
👉🏻मग हा प्रश्न केवळ तावरजा नदीबाबतच का ? मागील 2-3 वर्षात लातूर लातूरच्या सभोवताली जवळपास 80 ते 85 ठिकाणी असे नदी - नाला खोलीकरण सरळीकरणाचे काम अनेक खासगी संस्थानी केलेले आहे.(ऍड. 96896 74503) अगदी नुकत्याच झालेल्या मांजरा नदीच्या 18 किलोमीटर खोलीकरणाचाही विचार केला तर या नदीच्या खोलीकरणा दरम्यान वाळू , रेती आणि गाळाची काळी मृदा अशी गौण खनिजे किती मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाली असतील याचा सहज अंदाज लावला जाऊ शकतो.
👉🏻 जलसंधारण विभागाच्या शासन निर्णय क्र. राकृयो-2011/प्र क्र 72/जल -7 दि. 9 मे 2013 प्रमाणे ज्या पात्रात वाळू साठा आहे तेथे खोलीकरण करण्यात येऊ नये असे स्पष्ट केलेले आहे तसेच ज्या ठिकाणी पात्रांची खोली 3 मीटर पेक्षा जास्त आहे त्या ठिकाणचे खोलीकरण भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली व्हावे असेही त्यात नमूद आहे. (ऍड. श्रीराम कुलकर्णी कॉपीराईट)
👉🏻 मुळात तावरजा नदीचे पेठ भागात खोलीकरण 2013 मध्येच आर्ट ऑफ लिव्हिंग ने केले होते. म्हणजेच जेव्हा पहिल्यांदा या ठिकाणी खोलीकरण केले गेले तेव्हाच या ठिकाणाहून वाळूसाठा काढण्यात आला (ज्याची नोंद कुठल्याही शासकीय कार्यालयात नाही ). नदीपात्रात वाळू तयार होण्यासाठी 20 ते 25 वर्षे इतका कालावधी लागतो. म्हणजेच सनफ्लॉवर ने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या परवानगी प्रमाणे 2016 मध्ये केवळ नदीपात्रात पुन्हा साचलेला गाळ काढला असण्याची शक्यता आहे.
👉🏻 'आर्ट ऑफ लिव्हिंग' या संस्थेने लातूर भागात 50 पेक्षा अधिक ठिकाणी खोलीकरणाची कामे केल्याची यादी सोशल मीडिया वर नुकतीच प्रसिद्ध केली आहे. पण जिल्हाधिकारी, लातूर यांनी मागील महिन्यातच जाहीर केले की, लातूर जिल्ह्यात कोणालाही नदी खोलीकरणाची लेखी परवानगी दिली गेलेली नाही.(Copyright Post of Adv. Kulkarni) म्हणजेच ज्या ज्या संस्थानी लातूर भागात नद्या खोलीकरण केले ते सर्वच बेकायदेशीर ठरते.
👉🏻 वाळू उपश्याची साधी टीप मिळाली तरी भरधाव वेगात शासकीय गाड्या पळवत नेणाऱ्या तहसीलदारांना मांजराच्या 18 किलोमीटर किंवा तावरजाच्या 24 किलोमीटर खोलीकरणादरम्यान एकदाही तिकडे का फिरकावे वाटले नाही ? हा प्रश्न गंभीर आहे.
👉🏻 ज्या ज्या संस्थानी लातूर भागात नदी -नाले खोलीकरणाची कामे केली त्यापैकी कोणीही प्राप्त गौण खनिजाचा तपशील आजपर्यंत जाहीर केला नाही. विशेष म्हणजे या संस्थानी खोलीकरणाचे कोणतेही उद्देश जाहीर केले नाहीत, या कामासाठी लागणाऱ्या शासकीय परवानग्या अशा संस्थाकडे नाहीत. कोणीही तज्ञ व्यक्ती अथवा संस्था या कामांचे मूल्यमापन अथवा निरीक्षण करताना दिसत नाही. आणि म्हणूनच सध्या सुरू असलेले नदी नाला खोलीकरण हे खासगी पद्धतीने सहज नदीपात्रातून हवे तितके गौण खनिज काढून घेण्याचा साधा सोपा मार्ग बनत चाललाय हि बाब शासन गांभीर्याने घेणार आहे का ?
ऍड. श्रीराम कुलकर्णी -नांदगावकर 
9689674503 🖊


No comments:

Post a Comment